शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

तुफानी हल्लाबोल : शहा-राहुल यांच्यात वाक्युद्ध! एकमेकांच्या बालेकिल्ल्यात शिरून घेतले तोंडसुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:46 AM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मंगळवारी परस्परांच्या बालेकिल्ल्यांत शिरून एकमेकांवर तुफानी हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मंगळवारी परस्परांच्या बालेकिल्ल्यांत शिरून एकमेकांवर तुफानी हल्लाबोल केला.काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असलेल्या गुजरातच्या दुस-या दिवशीच्या दौºयात राहुल गांधी यांनी शहा, पंतप्रधाननरेंद्र मोदी व भाजपावर बोचरी टीका केली, तर खा. राहुल गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघामध्ये अमित शहा यांनी थेट राहुल गांधींवर तोफ डागली.राहुल गांधी व अमित शहा यांनी दिवसभरात एकमेकांविरुद्ध केलेल्या वाक्ताडनाचा ठळक गोषवारा असा:राहुल गांधी : सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सांगायचे की, मला पंतप्रधान नव्हे, तर देशाचा चौकीदार व्हायचे आहे. चौकीदार के सामने चोरी हुई.. तो वो चौकीदार थे या भागिदार?अमित शहा : भाजपाने काय दिले, असे वारंवार विचारता. आम्ही देशाला ‘बोलणारा’ पंतप्रधान दिला आहे. (त्यांचा रोख आधीचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे होता.)विकासाचे गुजरात मॉडेलराहुल गांधी : गुजरातचे कर्ज दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विकासाच्या नावाखाली एवढे कर्ज काढूनही शेतकरी व गरिबांची स्थिती हालाखीचीच आहे. विकासाचे हे मॉडेल अपयशी ठरले आहे.अमित शहा : ते गुजरातच्या विकासावरून टिंगल करत आहेत. पण तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केले, असे मला काँग्रेसच्या ‘शहजाद्यां’ना विचारायचे आहे. तुम्ही आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागत आहात, पण अमेठीचे लोक तुमच्या तीन पिढ्यांचा हिशेब मागत आहेत. राहुलबाबांनी इटालियन चश्मा लावल्याने त्यांना विकास दिसत नाही!भ्रष्टाचाराविषयीराहुल गांधी : एक कंपनी (जय शहा यांची?) सहा-सात वर्षांपूर्वी स्थापन झाली. सन २०१४मध्ये ती अगदीच मामुली होती. पण त्यानंतर काही महिन्यांतच ती कंपनी एवढी मोठी झाली की तिची उलाढाल ५० हजार रुपयांवरून चक्क ८० कोटी रुपयांवर पोहोचली. त्या कंपनीस कर्ज कोणी दिले? केंद्र सरकारच्या पीयूष गोयल यांच्या खात्याने.अमित शहा : काँग्रेसने देशावर ७० वर्षे राज्य केले. मला तुम्हाला असे विचारायचे आहे की, तुम्ही येथील (अमेठीमध्ये) बराच काळ खासदार असूनही इथे जिल्हाधिकारी कार्यालय, टीबी हॉस्पिटल व आकाशवाणीचे एफएम केंद्र का नाही? गोमती नदीमुळे इथे होणारी जमिनीची धूप अजूनही का थांबलेली नाही?सुशासन आणि सरकारी कारभारराहुल गांधी : भाजपाला २२ वर्षांत जमणार नाही तेवढे काम काँग्रेस फक्त सहा महिन्यांत करून दाखवील!अमित शहा : (अमेठीवासीयांना उद्देशून) तुम्ही एकाच कुटुंबावर ६० वर्षे विश्वास ठेवलात. आता भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवा म्हणजे पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही!

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह