शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 11:57 IST

भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

ठळक मुद्देभाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. देशात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. मात्र सध्या जो विरोधी पक्ष आहे तो भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे अशी टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटरवरून काँग्रेसला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र निकालानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

देशात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. मात्र सध्या जो विरोधी पक्ष आहे तो भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे अशी टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटरवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. 'भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची गरज आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे' असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. 

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला

देशाचे लक्ष लागून असलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसला इतिहासामध्ये प्रथमच पराभव स्वीकारावा लागला आहे. राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. 'राजकारण हा काही पोरखेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असं होत नाही. राजकारण करायचं तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा' असं मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांना म्हटलं आहे.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनेका यांनी ही टीका केली आहे. 

राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, माजी पतंप्रधान मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर करण्याची शक्यता आहे.

पराभवाची जबाबदारी स्वीकारून काही राज्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाचे संघटना मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काय उपाय योजता येतील, यावरही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होईल. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त 52 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी