शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
4
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
5
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
6
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
7
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
8
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
9
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
10
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
11
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
12
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
13
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
14
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
15
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
16
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
17
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
18
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
19
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
20
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!

"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:24 IST

Rajnath Singh Speech on Operation Sindoor: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारच्या वतीने भूमिका मांडली. 

Rajnath Singh Speech on Pahalgam: "मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात आहे. कधीही राजकारणाकडे शत्रूत्वाच्या नजरेने बघितले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत, तर असे नाहीये की नेहमीच सत्तेत राहू. जनतेने जेव्हा आमच्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली, तेव्हा आम्ही ती सकारात्मक पद्धतीने पार पाडली", अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना लोकसभेत सुनावले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोमवारपासून चर्चा सुरू झाली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरूवात करत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. 

"जेव्हा लक्ष्य मोठे असते, तेव्हा..."

लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, "विरोध पक्षाचे लोक विचारत आहेत की, आपले किती लढाऊ विमाने पाडली गेली. हा प्रश्न जनभावनेचं योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व करत नाही. त्यांना विचारायचंच असेल, तर त्यांनी आम्हाला विचारावं की, भारतीय लष्कराने शत्रूंची किती विमाने पाडले? त्यांनी प्रश्न विचारावा की, ऑपरेशन सिंदूर  यशस्वी झाले आहे का? तर उतर आहे, हो", असे उत्तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिले. 

"जेव्हा लक्ष्य मोठे असते, तेव्हा छोट्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. त्यामुळे देशाची सुरक्षा, लष्कराच्या जवानांच्या सन्मान आणि उत्साहावरून लक्ष विचलित होऊ शकतं. विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरबद्दल व्यवस्थित प्रश्न विचारत नाहीये, त्यामुळे काय उत्तर देऊ?", असे राजनाथ सिंह म्हणाले. 

"आम्ही कायमच सत्तेत राहू असे नाही" 

राजनाथ सिंह म्हणाले, "मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात आहे. कधीच राजकारणाकडे शत्रूत्वाच्या नजरेने बघितले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही. जनतेने आमच्यावर जेव्हा विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली आणि आम्ही ती सकारात्मक पद्धतीने निभावली. आम्ही १९६२ मध्ये चीनसोबतच्या युद्धात वाईट परिणाम आला. तेव्हा आम्ही विचारले की दुसऱ्या देशाने आपल्या भूमीवर ताबा कसा मिळवला? आम्ही विचारलं की, जवान शहीद कसे झाले? आम्ही मशीन आणि तोफाची काळजी न करता देशाच्या भल्याचा विचार केला."

"१९७१ जेव्हा आपण पाकिस्तानला धडा शिकवला. आम्ही राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक केले. अटल बिहारी वाजपेयी संसदेत उभे राहून त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाचे कौतुक केले होते. आम्ही त्यावेळीही असे प्रश्न विचारले नाही. हाच मुद्दा आणि वास्तविक स्वरुपात सांगायचं झालं, तर परीक्षेत निकालच महत्त्वाचा असतो", असे उत्तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन