शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रिक्षापेक्षा विमान प्रवास स्वस्त; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 10:51 IST

जयंत सिन्हा यांच्याकडून विमान आणि रिक्षा प्रवासाची तुलना

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला विमान प्रवास रिक्षा प्रवासापेक्षा स्वस्त झाला आहे, असं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये बोलत असताना सिन्हा यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाची तुलना केली. सध्या अनेक विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर कमी आले आहेत. त्याचा संदर्भ देत सिन्हा यांनी विमान प्रवास किफायतशीर झाल्याचं सांगितलं.सोमवारी जयंत सिन्हा टर्मिनल भवनचं उद्घाटन करण्यासाठी गोरखपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाच्या दरांची तुलना केली. 'मी तुमच्यासमोर काही आकडे सांगू इच्छितो. त्यावरुन विमान उड्डाण क्षेत्रात कशी क्रांती घडली आहे, याची कल्पना तुम्हाला येईल', असं सिन्हा यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं. यानंतर त्यांनी विमान आणि रिक्षा प्रवासाच्या भाड्याची तुलना केली. 'आज दोनजण रिक्षानं गेल्यास 10 रुपये प्रति किलोमीटरच्या दरानं प्रवास भाडं देतात. म्हणजे एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवासामागे 5 रुपये इतका खर्च येतो. मात्र तुम्ही हवाई प्रवास करत असाल, तर तुम्हाला एक किलोमीटर प्रवासासाठी फक्त 4 रुपये द्यावे लागतात,' अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. देशातील दळणवळण क्षेत्रात क्रांती होत असल्याचं जयंत सिन्हा यांनी केली. 'विमान वाहतूक क्षेत्रात घडलेली क्रांती डोळ्यात भरणारी आहे. यामुळे प्रवासी वाहतूक अतिशय स्वस्त झाली आहे. भाजपा सत्तेत येण्याआधी देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या 6 कोटी इतकी होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा 12 कोटींवर जाईल. देशातील विमानतळांची संख्यादेखील 75 वरुन 100 वर पोहोचली आहे,' असं सिन्हा यांनी सांगितलं. 'आधी रांचीत 8-10 विमानं यायची. आता तिथे 30 विमानांची ये-जा होते. अलाहाबाद, कानपूर, जेवर, गोरखपूर या विभागांचाही वेगानं विस्तार होत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Jayant Sinhaजयंत सिन्हाairplaneविमानAirportविमानतळ