शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

रिक्षापेक्षा विमान प्रवास स्वस्त; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 10:51 IST

जयंत सिन्हा यांच्याकडून विमान आणि रिक्षा प्रवासाची तुलना

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला विमान प्रवास रिक्षा प्रवासापेक्षा स्वस्त झाला आहे, असं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये बोलत असताना सिन्हा यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाची तुलना केली. सध्या अनेक विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर कमी आले आहेत. त्याचा संदर्भ देत सिन्हा यांनी विमान प्रवास किफायतशीर झाल्याचं सांगितलं.सोमवारी जयंत सिन्हा टर्मिनल भवनचं उद्घाटन करण्यासाठी गोरखपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाच्या दरांची तुलना केली. 'मी तुमच्यासमोर काही आकडे सांगू इच्छितो. त्यावरुन विमान उड्डाण क्षेत्रात कशी क्रांती घडली आहे, याची कल्पना तुम्हाला येईल', असं सिन्हा यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं. यानंतर त्यांनी विमान आणि रिक्षा प्रवासाच्या भाड्याची तुलना केली. 'आज दोनजण रिक्षानं गेल्यास 10 रुपये प्रति किलोमीटरच्या दरानं प्रवास भाडं देतात. म्हणजे एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवासामागे 5 रुपये इतका खर्च येतो. मात्र तुम्ही हवाई प्रवास करत असाल, तर तुम्हाला एक किलोमीटर प्रवासासाठी फक्त 4 रुपये द्यावे लागतात,' अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. देशातील दळणवळण क्षेत्रात क्रांती होत असल्याचं जयंत सिन्हा यांनी केली. 'विमान वाहतूक क्षेत्रात घडलेली क्रांती डोळ्यात भरणारी आहे. यामुळे प्रवासी वाहतूक अतिशय स्वस्त झाली आहे. भाजपा सत्तेत येण्याआधी देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या 6 कोटी इतकी होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा 12 कोटींवर जाईल. देशातील विमानतळांची संख्यादेखील 75 वरुन 100 वर पोहोचली आहे,' असं सिन्हा यांनी सांगितलं. 'आधी रांचीत 8-10 विमानं यायची. आता तिथे 30 विमानांची ये-जा होते. अलाहाबाद, कानपूर, जेवर, गोरखपूर या विभागांचाही वेगानं विस्तार होत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Jayant Sinhaजयंत सिन्हाairplaneविमानAirportविमानतळ