शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पश्चिम बंगालचे नाव बदलणार; ममता बॅनर्जींच्या खासदाराची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 11:03 IST

पश्चिम बंगालधील ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये जुलै 2018 मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून तणावाचे वातावरण आहे. यामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल विधानसभेचे गेट बंद केल्याने उपोषणाला बसल्याचा प्रकार घडला होता. पश्चिम बंगालचे नामांतर बांग्ला करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला जुलै महिन्यात दिल्लीत फेटाळण्यात आले होते. आता पुन्हा राज्य सभेत खासदाराने हा प्रस्ताव मांडला आहे. 

पश्चिम बंगालधील ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये जुलै 2018 मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. यानंतर हा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे पाठविला होता. मात्र, वर्षभराने यांवर भाजपा सरकारने असे राज्याचे नाव बदलता येणार नसल्याचे सांगितले होते. 

बॅनर्जी सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात तीन वेगवेगळी नावे देण्यात आली होती. बंगाली मध्ये बांग्ला, इंग्रजीमध्ये बेंगाल आणि हिंदीमध्ये बंगाल अशी तीन नावे मुंजुरीसाठी दिली होती. मात्र, केंद्राने यावर अशी तीन तीन नावे देता येणार नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच नामांतरासाठी संविधानामध्ये बदल करावे लागणार असल्याचे सांगितले होते. 

यामुळे आज तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी राज्यसभेमध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बंगाल करण्याचा प्रस्ताव शून्य प्रहरामध्ये मांडला आहे. एकच नाव देण्यास सांगितल्याने पश्चिम नाव वगळून केवळ बंगाल ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRajya Sabhaराज्यसभाMamata Banerjeeममता बॅनर्जी