केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, ज्यावर या बजेटचा थेट परिणाम होणार आहे. भाजपासाठी पश्चिम बंगालची सत्ता हे सर्वात मोठं आव्हान आहे. बजेट सादर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत बंगालसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे.
टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "तुम्ही सर्वजण सभागृहात उपस्थित होतात आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १ तास २५ मिनिटं भाषण केलं. या संपूर्ण वेळात पश्चिम बंगालचा उल्लेखही झाला नाही. या बजेटमध्ये तरुण, शेतकरी किंवा रोजगाराचाही कोणताही उल्लेख नाही. जे सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), स्किल इंडिया आणि प्रगत तंत्रज्ञानावर बोलत आहे, ते रोजगारावर मात्र बोलत नाही."
"जुनं सामान नव्या डब्यात...”; बजेटवरुन रोहिणी आचार्य यांचा सरकारवर जोरदार निशाणा
“अर्थसंकल्प चेहरा नसलेला, आधार नसलेला, व्हिजन नसलेला”
बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारने अर्थसंकल्पात हे देखील स्पष्ट केलं नाही की तरुणांना रोजगार कसा मिळेल किंवा कोणत्या दिशेने रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी किंवा उत्पन्न स्थिर करण्याच्या पद्धतींवर काहीही बोललं गेलं नाही. कोणत्याही समाजासाठी कोणताही उपाय सांगितलेला नाही. हा अर्थसंकल्प चेहरा नसलेला, आधार नसलेला आणि व्हिजन नसलेला आहे."
बजेटमध्ये महिलांसाठी ५ मोठ्या घोषणा; नारीशक्तीसोबतच भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार 'पॉवर डोस'
नव्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील दानकुनीपासून पश्चिमेकडील सूरतपर्यंत नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा केली आहे. याशिवाय, देशातील सात शहरांना हाय-स्पीड रेल कॉरिडॉरने जोडण्याची घोषणाही करण्यात आली आहे, ज्यामध्ये बंगालमधील सिलीगुडीचाही समावेश आहे. या ७ शहरांच्या हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये वाराणसी-सिलीगुडी, मुंबई-पुणे, चेन्नई-बंगळुरू, हैदराबाद-बंगळुरू, पुणे-हैदराबाद आणि दिल्ली-वाराणसी यांचा समावेश आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून तिथेही निवडणुका होणार आहेत.
Web Summary : TMC MP Abhishek Banerjee criticized the Union Budget 2026 for neglecting West Bengal. He stated the budget lacked vision, offered nothing for youth, farmers, or employment, and failed to address economic security.
Web Summary : टीएमसी सांसद अभिषेक बनर्जी ने पश्चिम बंगाल को नजरअंदाज करने के लिए केंद्रीय बजट 2026 की आलोचना की। उन्होंने कहा कि बजट में दृष्टि की कमी है, युवाओं, किसानों या रोजगार के लिए कुछ भी नहीं है, और आर्थिक सुरक्षा को संबोधित करने में विफल रहा।