शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ..."; काश्मीर मुद्द्यावर अमित शाहांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 20:09 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना भारताच्या इतिहासाबद्दल आणि जम्मू काश्मीरच्या इतिहासावरही भाष्य केले. 

Amit Shah on Kashmir: 'मला आनंद वाटत आहे की, आज काश्मीर पुन्हा एकदा भारताचे अविभाज्य अंग म्हणून विकासाच्या वाटेवर चालू लागला आहे. काश्मिरात लोकशाही प्रस्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की, जे काही आम्ही गमावले, ते लवकरच परत मिळवू', असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केले. 

'जम्मू काश्मीर, लडाख: सातत्य आणि संबंधाचा ऐतिहासिका वृत्तांत' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बुधवारी झाले. 

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, "काश्मिरी, डोगरी, बाल्टी आणि झंस्कारी या भाषांना शासनाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह होता की, केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यानंतर काश्मिरीतील छोट्या छोट्या स्थानिक भाषा जिवंत ठेवायच्या आहेत. यावरून कळते पंतप्रधान काश्मीरबद्दल किती विचार करतात."

काश्मीरला तोडण्याचे प्रयत्न झाले होते - अमित शाह

अमित शाह म्हणाले, "काश्मीर भारताचे अविभाज्य अंग होते आणि राहील. काश्मीरला तोडण्याचे प्रयत्न लोकांनी केले, पण आम्ही ती गोष्टच हटवली आहे. इतिहास दिल्लीत बसून लिहिला जात नाही. त्यासाठी तिथे जाऊन समजून घ्यावे लागेल. सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ गेली आहे. मी भारतातील इतिहासकारांना आवाहन करतो की, पुरावांच्या आधारावर इतिहास लिहा", अशी भूमिका शाह यांनी मांडली. 

शाह म्हणाले, "आपल्या सगळ्यांना माहितीये की, काश्मीरला कश्यपची भूमि म्हणून ओळखले जाते. कदाचित असेही असू शकते की, त्यांच्या नावावरून काश्मीर हे नाव पडले. जगात भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याची सीमा सांस्कृतिक परंपरांवर आधारित आहे. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत अखंड आहे."

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखhistoryइतिहास