शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ..."; काश्मीर मुद्द्यावर अमित शाहांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 20:09 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना भारताच्या इतिहासाबद्दल आणि जम्मू काश्मीरच्या इतिहासावरही भाष्य केले. 

Amit Shah on Kashmir: 'मला आनंद वाटत आहे की, आज काश्मीर पुन्हा एकदा भारताचे अविभाज्य अंग म्हणून विकासाच्या वाटेवर चालू लागला आहे. काश्मिरात लोकशाही प्रस्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की, जे काही आम्ही गमावले, ते लवकरच परत मिळवू', असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केले. 

'जम्मू काश्मीर, लडाख: सातत्य आणि संबंधाचा ऐतिहासिका वृत्तांत' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बुधवारी झाले. 

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, "काश्मिरी, डोगरी, बाल्टी आणि झंस्कारी या भाषांना शासनाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह होता की, केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यानंतर काश्मिरीतील छोट्या छोट्या स्थानिक भाषा जिवंत ठेवायच्या आहेत. यावरून कळते पंतप्रधान काश्मीरबद्दल किती विचार करतात."

काश्मीरला तोडण्याचे प्रयत्न झाले होते - अमित शाह

अमित शाह म्हणाले, "काश्मीर भारताचे अविभाज्य अंग होते आणि राहील. काश्मीरला तोडण्याचे प्रयत्न लोकांनी केले, पण आम्ही ती गोष्टच हटवली आहे. इतिहास दिल्लीत बसून लिहिला जात नाही. त्यासाठी तिथे जाऊन समजून घ्यावे लागेल. सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ गेली आहे. मी भारतातील इतिहासकारांना आवाहन करतो की, पुरावांच्या आधारावर इतिहास लिहा", अशी भूमिका शाह यांनी मांडली. 

शाह म्हणाले, "आपल्या सगळ्यांना माहितीये की, काश्मीरला कश्यपची भूमि म्हणून ओळखले जाते. कदाचित असेही असू शकते की, त्यांच्या नावावरून काश्मीर हे नाव पडले. जगात भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याची सीमा सांस्कृतिक परंपरांवर आधारित आहे. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत अखंड आहे."

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखhistoryइतिहास