शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:18 IST

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती.

बेंगळुरू : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पुढील जनगणनेत पुरेसा निधी वाटप करावा आणि जातनिहाय गणनेसाठी वेळ मर्यादा निश्चित करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती. आम्हाला जे साध्य करायचे होते, ते पूर्ण झाल्याबद्दल आनंद वाटतो. दोन वर्षांपूर्वी मी केंद्र सरकारला जातीय जनगणनेबाबत पत्र लिहिले होते, तेव्हा सरकार सहमत नव्हते. आता  घेतलेला निर्णय ही चांगली गोष्ट आहे.

नक्षलींचा 'डोंगर' सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाई

सरकरने कालमर्यादा ठरवावी. जर कालमर्यादा नसेल तर त्याला बराच वेळ लागेल. म्हणून माझी सूचना अशी आहे की सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे. दोन-तीन महिन्यांत किंवा सरकारने ठरवलेल्या कोणत्याही वेळेच्या आत, शक्य तितक्या लवकर सर्वेक्षण करावे आणि लोकांना दिलेले वचन पूर्ण करावे.

- मल्लिकार्जुन खरगे , काँग्रेस अध्यक्ष

राहुल गांधींचा पुढाकार

आगामी बिहार निवडणुका लक्षात घेऊन जातीय जनगणनेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे,  असे मला वाटत नाही असे एका प्रश्नाच्या उत्तरात खरगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मला राजकारण करायचे नाही. जे चांगले आहे, त्याचे मी स्वागत करतो, जे वाईट आहे त्याचा मी विरोध करतो, कारण शेवटी देश महत्त्वाचा, लोक महत्त्वाचे आहेत. लोकांना जातीय जनगणना हवी होती, म्हणून आम्ही त्याची मागणी करण्यासाठी आंदोलने केली. सर्व विरोधी पक्षांनी देशभर त्यासाठी दबाव आणला. राहुल गांधींनी जातीय जनगणनेची मागणी करण्यात पुढाकार घेतला.

कर्नाटकसह काही राज्यांच्या सर्वेक्षणांवर टीका केली जात आहे, यावर खरगे म्हणाले,  की आता केंद्र सरकार सर्व्हे करीत आहे, यावर ते टीका करतात का ते पाहूया. जातींची गणना करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, ती दिखाऊगिरी नसावी आणि आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण परिपूर्ण पद्धतीने केले पाहिजे."

निधी वितरण करा

केंद्र सरकारने बुधवारी आगामी जनगणनेत "पारदर्शक" पद्धतीने जातीय गणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्याचे आवाहन करताना, खर्गे म्हणाले की, आजपर्यंत सरकारने त्यासाठी पुरेशा निधीचे वाटप केलेले नाहीत आणि निधीशिवाय सर्वेक्षण कसे करता येईल?

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस