शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

CoronaVirus News : "कोरोना चाचण्यांमध्ये हेराफेरी, रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप"

By सायली शिर्के | Updated: October 29, 2020 11:59 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 80,40,203 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,881 नवे रुग्ण आढळले असून 517 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,20,527 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए. वेलुमणी यांनी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतीमा चांगली ठेवण्यासाठी कोरोनाची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला आहे. "सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे" असं म्हटलं आहे. 

थायरोकेअरच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला गंभीर आरोप

"आम्हाला विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमुने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही खोटा पॉझिटिव्ह रिपोर्ट सादर करत असल्याचा दावा केला जात आहे" अशी माहिती ए. वेलुमणी यांनी दिली आहे. थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील कोरोनाग्रस्तांचे नमुने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येत आहे. 

"कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील उद्देश"

"दररोज कमीतकमी 100 जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमुने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतीमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी 30 टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे" अशी माहिती वेलुमणी यांनी दिली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतलं नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मेट्रोपोलीस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना महामारीमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. "जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकीच कोरोनाग्रस्तांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो" असंही शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत