शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : "कोरोना चाचण्यांमध्ये हेराफेरी, रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप"

By सायली शिर्के | Updated: October 29, 2020 11:59 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 80,40,203 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,881 नवे रुग्ण आढळले असून 517 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,20,527 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए. वेलुमणी यांनी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतीमा चांगली ठेवण्यासाठी कोरोनाची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला आहे. "सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे" असं म्हटलं आहे. 

थायरोकेअरच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला गंभीर आरोप

"आम्हाला विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमुने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही खोटा पॉझिटिव्ह रिपोर्ट सादर करत असल्याचा दावा केला जात आहे" अशी माहिती ए. वेलुमणी यांनी दिली आहे. थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील कोरोनाग्रस्तांचे नमुने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येत आहे. 

"कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील उद्देश"

"दररोज कमीतकमी 100 जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमुने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतीमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी 30 टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे" अशी माहिती वेलुमणी यांनी दिली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतलं नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मेट्रोपोलीस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना महामारीमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. "जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकीच कोरोनाग्रस्तांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो" असंही शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत