शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:45 IST

भाजप खासदार कंगना राणौत यांनी मोठ्या विरोधानंतर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे परत आणावेत, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध झाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते. दरम्यान, आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा खासदार कंगना राणौत यांनी केली आहे. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी करायला हवी, असे कंगना रणौत यांनी सांगितले. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. 

कंगना राणौत यांनी सोमवारी मंडीच्या नाचन विधानसभेत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी  माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली. त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे. कंगना राणौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

काँग्रेसने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. 'शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कायदे परत आणले पाहिजेत. असे भाजप खासदार कंगना राणौत यांनी सांगितले. देशातील ७५० हून अधिक शेतकरी शहीद झाले, तेव्हाच मोदी सरकारला जाग आली आणि हे काळे कायदे मागे घेण्यात आले. आता भाजप खासदार पुन्हा हे कायदे मागे घेण्याचा विचार करत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासदारांनी कितीही प्रयत्न केले तरी हे काळे कायदे परत येणार नाहीत',असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

खासदार कंगना राणौत काय म्हणाल्या?

खासदार कंगना राणौत माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, 'शेतकऱ्यांबाबतचे जे कायदे मागे घेतले आहेत, ते पुन्हा लादले जावेत, असे मला वाटते. हे वादग्रस्त असू शकते, पण मला वाटते की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कायदे परत आले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी केली पाहिजे. जेणेकरून इतर ठिकाणांप्रमाणे आमचे शेतकरी समृद्ध होत असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीला कुठेही खंड पडू नये. शेतकरी हा देशाच्या विकासातील प्रमुख शक्तीचा आधारस्तंभ आहे. काही राज्यांमध्ये ज्या तीन कायद्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ते कायदे स्विकारावेत, अशी विनंती मी त्यांना करू इच्छितो, असंही राणौत म्हणाल्या. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाFarmerशेतकरी