शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:13 IST

विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे.

लखनौचे रहिवासी विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. आधी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजस्थानमध्येअपघातात त्यांची तिसरी मुलगी जया शर्माने जीव गमावला आहे. "आता आम्ही कोणासाठी जगू, आधीच दोन मुलांना खांदा दिला आहे. देवा! कसली परीक्षा घेतोयस..." असं विनोद कुमार यांनी म्हटलं आहे.  विनोद कुमार लखनौच्या अमिनाबाद येथे कॉस्मेटिकचं दुकान चालवतात. त्यांना पाच मुलं होती. १७ एप्रिल २०१४ रोजी मोठी मुलगी सोनालीचा अपघातात मृत्यू झाला.  त्यानंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलगा अभिषेकचाही एका अपघातात मृत्यू झाला. आता तिसरी मुलगी जयाचा अपघातात मृत्यू झाल्याने पालक पुन्हा एकदा हादरले. देवा, तू आमच्यापासून तीन मुलांना का हिरावून घेतलंस? असा प्रश्न आता आई विचारत आहे.

शनिवारी रात्री राजस्थानमधील बरण येथे एका वेगवान कारने पिकअपला धडक दिली. या अपघातात लखनौच्या कैसरबाग येथील शिवाजी मार्गावर राहणारा नमन चतुर्वेदी (२५), जया शर्मा, गोरखपूरची अंशिका मिश्रा आणि दिल्लीचा राहुल प्रकाश (३०) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण रात्री  राजस्थानच्या कोटा येथे जात होते. कारचा वेग खूप जास्त होता. 

अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये नमन, अंशिका आणि राहुलचा मृत्यू झाला होता. जयाची प्रकृती गंभीर होती, उपचारासाठी तिला कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यू