शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 5:25 PM

भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला.

मंगळुरू - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एअर स्ट्राईकसंदर्भात बोलताना भारताने तीन स्ट्राईक केल्याचं सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे बोलताना राजनाथसिंह यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आतापर्यंत तीन स्ट्राईक केल्याचं म्हटलं. मात्र, मी तुम्हाला केवळ दोन स्ट्राईकबद्दल सांगणार असून तिसऱ्या स्ट्राईकबद्दल सांगणार नाही, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. 

भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला. मात्र, मी तुम्हाला केवळ दोनच स्ट्राईकची माहिती देणार आहे. तुम्हाला तिसऱ्या स्ट्राईकची माहिती देणार नाही, असे म्हणत राजनाथसिंह यांनी तिसऱ्या स्ट्राईकची उत्कंठा वाढवली आहे. कारण, माहिती देताना राजनाथसिंह यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा हल्ला आणि पुलवामा हल्ल्यानंतरचा एअर स्ट्राईक याबाबत सांगितले. त्यामुळे तिसरा स्ट्राईक नेमका कोणता असा प्रश्न उपस्थितांना पडला असून आता देशातील जनतेलाही त्या तिसऱ्या स्ट्राईकबद्दल उत्कंठा लागून राहिली आहे. 

आताचा भारत दुबळा राहिला नाही, सशक्त भारत आहे. त्यामुळेच, गेल्या 5 वर्षात भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना तीन स्ट्राईक केले. मात्र, राजनाथसिंह यांनी तिसऱ्या स्ट्राईकबाबत काहीही सांगणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण बनले आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण होताना दिसत आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानHome Ministryगृह मंत्रालय