शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महिनाअखेरपर्यंत हजार टन कांदा आयात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:17 IST

देशभर कांद्याची प्रचंड टंचाई असून, त्याचे भाव प्रतिकिलो ८0 रुपयांवर गेले आहेत

नवी दिल्ली : देशभर कांद्याची प्रचंड टंचाई असून, त्याचे भाव प्रतिकिलो ८0 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी विदेशातून कांदा आयात करण्यासाठी ऑडर्स दिल्या असून, चालू महिन्याच्या अखेरपर्यंत किमान १ हजार टन कांद्याची आयात होऊ शकेल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत कांदा १०० रुपये किलो झाला होता. सरकारने विविध पातळ्यांवर हस्तक्षेप केल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या. तरीही सध्या कांद्याचे दर ६० ते ८0 रुपये किलोच्या दरम्यान असून, विदेशी कांदा आल्यानंतरच ते खाली येऊ शकतील, असे सूत्रांनी सांगितले.वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, खासगी व्यापाऱ्यांनी अल्प प्रमाणात कांदा आयात केल्याचे सरकारला कळविले आहे. याशिवाय महिनाअखेरपर्यंत १ हजार टन कांद्याची आयात होणार आहे. पुढील महिन्यात आणखी १ हजार टन कांदा आयात होईल.अधिकाºयाने सांगितले की, डिसेंबरअखेरपर्यंत आयातीसाठी आवश्यक असलेले निकष शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कांदा आयात सुलभेतेने होईल. देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता व्हावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी सरकारने खासगी व्यापारी आणि सरकारी संस्था यांच्या माध्यमातून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. सरकारी मालकीच्या एमएमटीसीमार्फत १ लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमएमटीसीने ४ हजार टन कांदा आयातीसाठी निविदाही मागविल्या आहेत.सरकारच्या उपाययोजनासूत्रांनी सांगितले की, यंदा खरीप हंगामात पूर आणि दुष्काळ यामुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याची आयात करणे क्रमप्राप्तच ठरले आहे. कांद्याची उपलब्धता वाढावी, तसेच किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांत आयातीचे निकष शिथिल करणे, निर्यात बंदी, व्यापाºयांच्या साठ्यांवर मर्यादा आणि शिलकी साठ्यातील कांद्याची सवलतीच्या दरात विक्री यांचा समावेश आहे.

टॅग्स :onionकांदा