शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 14:05 IST

India-China Border News: चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

नवी दिल्ली - चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून रस्ते मार्गाने होणारा संपर्क बंद झाल्याने या भागामध्ये दैनंदिन गोष्टींबाबत संकट निर्माण झाले आहे. येथील रस्ते वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. गेल्या १०० दिवसांमध्ये मिळून केवळ ८ किमी मार्गच क्लिअर झाला आहे. (Thousands stranded on remote border with China, 100 days off road, food crisis)

१६ जून रोजी आलेल्या अस्मानी संटकामुळे दारमा आणि चौंदास खोऱ्याला जोडणारा मार्ग पूर्णपणे खराब झाला होता. बॉर्डरवरील या महत्त्वाच्या रस्त्यावर एक नाही तर डझनभर ठिकाणी भूस्थलन झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, ७० किमीच्या या मार्गावरील केवळ ८ किमीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावरील अनेक बॅली ब्रिज जमीनदोस्त झाले आहेत. अशीच परिस्थिती ब्यास खोऱ्यामध्ये आहे. ब्यास खोऱ्यामधूनच लिपुलेख खिंडीपर्यंत रोड जातो. मात्र थोड्याशा पावसामध्येही हा रस्ता जागोजागी बंद पडत आहे. बॉर्डरवरील व्यास, दारमा आणि चौंदास खोरे सामरिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून बॉर्डरवर संरक्षण दलसुद्धा पोहोचते.

स्थानिक आमदार हरीश धामी यांनी सांगितले की, या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे काम खूपच दुय्यम दर्जाचे झाले आहे. बीआरओच्या खराब कार्यप्रणालीमुळे हजारोंच्या लोकसंख्येवर संकटाची टांगती लवार आहे. अशा परिस्थितीत हे रस्ते बीआरओच्या अखत्यारीतून काढून घ्यावे. बीआरओ, पीडब्ल्यूडी आणि सीपीडब्ल्यूडी यांनी रस्त्यावर डझनभराहून अधिक मशीन तैनात केल्या आहेत. मात्र या मशिन आणि दीडशेहून अधिक कामगार कमी पडत आहेत. आता गावांमधील नागरिकांकडील दैनंदिन वापराच्या वस्तू जवळपास संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावांमधील दुकानांमध्ये जे काही सामान उरले आहे त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

सरकारने बॉर्डरवरील या तीन खोऱ्यांसाटी एक हेलिकॉप्टर दिले आहे. त्याच्यामाध्यमातून ग्रामस्थ धारचुला येथून काही वस्तू मागवत आहेत. मात्र हजारोंच्या लोकसंख्येसाठी ते अपुरे आहेत. डीएम आशिष चौहान यांचे म्हणणे आहे की, रस्ते उघडण्यासाठी तिन्ही कार्यदायी संस्था काम करत आहेत. मात्र विषम भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे अडचणी येत आहेत. यावर्षाच्या पावसामुळे बॉर्डर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

टॅग्स :Indiaभारत