शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 14:05 IST

India-China Border News: चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

नवी दिल्ली - चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून रस्ते मार्गाने होणारा संपर्क बंद झाल्याने या भागामध्ये दैनंदिन गोष्टींबाबत संकट निर्माण झाले आहे. येथील रस्ते वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. गेल्या १०० दिवसांमध्ये मिळून केवळ ८ किमी मार्गच क्लिअर झाला आहे. (Thousands stranded on remote border with China, 100 days off road, food crisis)

१६ जून रोजी आलेल्या अस्मानी संटकामुळे दारमा आणि चौंदास खोऱ्याला जोडणारा मार्ग पूर्णपणे खराब झाला होता. बॉर्डरवरील या महत्त्वाच्या रस्त्यावर एक नाही तर डझनभर ठिकाणी भूस्थलन झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, ७० किमीच्या या मार्गावरील केवळ ८ किमीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावरील अनेक बॅली ब्रिज जमीनदोस्त झाले आहेत. अशीच परिस्थिती ब्यास खोऱ्यामध्ये आहे. ब्यास खोऱ्यामधूनच लिपुलेख खिंडीपर्यंत रोड जातो. मात्र थोड्याशा पावसामध्येही हा रस्ता जागोजागी बंद पडत आहे. बॉर्डरवरील व्यास, दारमा आणि चौंदास खोरे सामरिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून बॉर्डरवर संरक्षण दलसुद्धा पोहोचते.

स्थानिक आमदार हरीश धामी यांनी सांगितले की, या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे काम खूपच दुय्यम दर्जाचे झाले आहे. बीआरओच्या खराब कार्यप्रणालीमुळे हजारोंच्या लोकसंख्येवर संकटाची टांगती लवार आहे. अशा परिस्थितीत हे रस्ते बीआरओच्या अखत्यारीतून काढून घ्यावे. बीआरओ, पीडब्ल्यूडी आणि सीपीडब्ल्यूडी यांनी रस्त्यावर डझनभराहून अधिक मशीन तैनात केल्या आहेत. मात्र या मशिन आणि दीडशेहून अधिक कामगार कमी पडत आहेत. आता गावांमधील नागरिकांकडील दैनंदिन वापराच्या वस्तू जवळपास संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावांमधील दुकानांमध्ये जे काही सामान उरले आहे त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

सरकारने बॉर्डरवरील या तीन खोऱ्यांसाटी एक हेलिकॉप्टर दिले आहे. त्याच्यामाध्यमातून ग्रामस्थ धारचुला येथून काही वस्तू मागवत आहेत. मात्र हजारोंच्या लोकसंख्येसाठी ते अपुरे आहेत. डीएम आशिष चौहान यांचे म्हणणे आहे की, रस्ते उघडण्यासाठी तिन्ही कार्यदायी संस्था काम करत आहेत. मात्र विषम भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे अडचणी येत आहेत. यावर्षाच्या पावसामुळे बॉर्डर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

टॅग्स :Indiaभारत