शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना पक्षात काही जबाबदारीच घ्यायची नाही, त्यांनी निवृत्त व्हावे : खरगे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:26 IST

आता उमेदवार निवडीत जिल्हा अध्यक्षांच्या शब्दाला महत्त्व.

अहमदाबाद : ज्यांनी पक्षकार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही, अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, त्यांनी निवृत्तीच स्वीकारावी, असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या नेत्यांना बुधवारी दिला. काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले. काँग्रेस देशातील ऐक्य कायम ठेवण्यासाठी झटते तर भाजप समाजात फूट पाडत आहे, असेही ते म्हणाले.

येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठकीच्या अखेरच्या दिवशी खरगे म्हणाले की, पक्ष संघटनेत यापुढे जिल्हा अध्यक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीत पक्षपात होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणुकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत त्यांच्याच शब्दाला महत्त्व असेल. जिल्हा अध्यक्षांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून एक वर्षाच्या आत बूथ कमिटी, मंडळ कमिटी, ब्लॉक कमिटी व जिल्हा कमिटीत चांगल्या लोकांना सामावून घेत तयार कराव्या लागतील. या नेमणुकांत कोणताही पक्षपात होऊ नये, ही त्यांची जबाबदारी असेल.

महाराष्ट्रात फसवणुकीने विजय मिळविल्याचा आरोपमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत भाजपने फसवणूक करून विजय मिळविल्याचा आरोप खरगे यांनी यावेळी केला. निवडणुकांत मतपत्रिकेच्या आधारेच मतदान घेतले जावे, अशीही मागणी त्यांनी केली.

संपूर्ण जग ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकांकडे वळत आहे; पण केंद्र सरकार ईव्हीएमसाठी आग्रही आहे. आपल्याला फायदा होईल, अशा प्रकारचेच तंत्रज्ञान केंद्र सरकारने ईव्हीएमसाठी विकसित केले आहे. केंद्र सरकारने ११ वर्षांपासून सातत्याने राज्यघटनेवर हल्ले केले. त्यामुळे राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेसने लढा सुरू केला आहे. संसदेत विरोधी पक्षनेत्याचे भाषणासाठी नाव पुकारले जाते; पण त्याला बोलू दिले जात नाही, असेही ते म्हणाले.

जिल्हा अध्यक्षांच्या तीन बैठकादेशभरातील जिल्हा अध्यक्षांच्या तीन बैठका घेण्यात आल्या. राहुल गांधी आणि मी त्यांच्याशी चर्चा केली. उमेदवार निवडीत त्यांना सामील करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस