शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"ज्यांनी नेहमीच आंबेडकरांचा अपमान केला, ते गैरसमज पसरवतायत, मी स्वप्नातही..."; अमित शाहंचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:28 IST

शाह म्हणाले, "असे यामुळे झाले, कारण भाजपच्या वक्त्यांनी, काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी आहे, असे सांगितले. काँग्रेसने सावरकरजींचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळी तुडवली. काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला. काँग्रेसने भारताची भूमी देऊन टाकली, या गोष्टी संसदेत सिद्ध झाल्यानंतर, काँग्रेसने खोटे पसरवण्यास सुरुवात केली."

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आपण स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही. काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी आहे. काँग्रेस पक्ष संविधान विरोधी आहे. बाबासाहेबांच्या पश्चातही काँग्रेसने कधी बाबासाहेबांना आदर दिला नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते जेपी नड्डा आणि अश्विनी वैष्णव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. अमित शाह म्हणाले, "संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. यात देशाची 75 वर्षांची गोरवशाली यात्रा, विकास यात्रा आणि उपलब्धी आदींवर चर्चा करण्यात आली. संसदेत पक्ष आणि विरोधक आहेत. लोकांचे स्वतःचे मत असणे स्वाभाविक आहे. पण संसदेत जेव्हा चर्चा होते तेव्हा ती वस्तुस्थिती आणि सत्याला धरून असावी. मात्र, कालपासून काँग्रेसने ज्या पद्धतीने वस्तुस्थिती विपर्यास करून मांडली याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

शाह पुढे म्हणाले, "असे यामुळे झाले, कारण भाजपच्या वक्त्यांनी, काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी आहे, असे सांगितले. काँग्रेसने सावरकरजींचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळी तुडवली. काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला. काँग्रेसने भारताची भूमी देऊन टाकली, या गोष्टी संसदेत सिद्ध झाल्यानंतर, काँग्रेसने खोटे पसरवण्यास सुरुवात केली. काँग्रेस पक्ष आंबेडकरविरोधी आहे. काँग्रेस पक्ष संविधानविरोधी आहे. काँग्रेसने लष्करातील शहीद जवानांचा अपमान केला. काँग्रेस सावरकर विरोधी आहे. बाबासाहेबांच्या पश्चातही काँग्रेसने बाबासाहेबांना कधीही आदर दिला नाही. पंडितजींच्या (नेहरू) अनेक पुस्तकांत लिहिलेले आहे की, त्यांनी बाबासाहेबांना कधीही योग्य स्थान दिले नाही."

"काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही, पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतले. काँग्रेसने आपल्या नेत्यांना भारतरत्न दिले. 1990 पर्यंत त्यांनी आंबेडकरांना भारतरत्न मिळणार नाही याची व्यवस्था केली. माझी विधाने चुकीच्या पद्धतीने विपर्यास करून मांडण्यात आली. काँग्रेस खोट्या बातम्या पसरवते. मी आंबेडकरांच्या विरोधात कधीही बोलू शकत नाही. काँग्रेसने माझी राज्यसभेतील विधाने चुकीच्या पद्धतीने मांडली," असेही शाह म्हणाले.भारतरत्न देण्यासंदर्भात बोलायचे तर, "काँग्रेस नेत्यांनी अनेक वेळा स्वतःच स्वतःला बारतरत्न दिले आहेत. 1955 मध्ये नेहरूजींनी स्वतःला भारतरत्न दिले, 1971 मध्ये इंदिराजींनी स्वतःला भारतरत्न दिला. मात्र, 1990 मध्ये काँग्रेस सत्तेत नसताना आणि भाजपच्या पाठिंब्याचे सरकार असताना बाबासाहेबांना भारतरत्न मिळाले. 1990 पर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही, तर बाबासाहेबांची 100वी जयंती साजरी करण्याचीही मनाई केली गेली," असेही शाह यावेळी म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपा