शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालणाऱ्या खासदारांना उत्तर देण्याची गरज नाही; ओम बिर्लांचे सर्व मंत्र्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:34 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज तुतू-मैमै पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दररोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुतू-मैमै पाहायला मिळत आहे. बुधवारी(दि.4)देखील लोकसभेत गदारोळ झाला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी मंत्र्यांना एक सल्ला दिला. 'ज्या सदस्यांना खुर्चीवर बसून बोलण्याची परवानगी नाही, त्यांना मंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज नाही,' असे बिर्ला म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारले जात असताना त्यांनी ही टिप्पणी केली.

विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खाली बसून काही टिपण्णी केली, ज्याच्या उत्तरात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिले. यावर बिर्ला म्हणाले, मंत्र्यांना विनंती आहे की, ज्यांना (सदस्यांना) बोलण्याची परवानगी दिली नाही, त्यांना उत्तरे देण्याची गरज नाही.

ओम बिर्ला मंत्र्यांवर कशामुळे चिडले?संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत शून्य तास सुरू होण्यापूर्वी अजेंड्यात विविध मंत्र्यांची नावे असलेली कागदपत्रे सादर केल्याबद्दल नाराजी ओम बिर्लांनी नाराजी व्यक्त केली. महत्वाच्यावेळी मंत्री उपस्थित नसल्यामुळे बिर्ला नाराज झाले आणि संबंधित मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहाणे गरजेचे असल्याची टिप्पणी केली. दरम्यान, सभागृहात मंत्री उपस्थित नसतात, तेव्हा प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुपारी 12 वाजता विषयपत्रिकेत नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित मंत्र्याच्या वतीने सभागृहाच्या टेबलावर ठेवली जातात.

तुम्ही एकमेकांना समजावून सांगू नकासभागृहात आवश्यक फॉर्म सादर करताना संसदीय कामकाज राज्यमंत्री मेघवाल यांनी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या नावाचा कागदपत्र ठेवला. यावेळी बिर्ला म्हणाले की, उद्योगमंत्री पियुष गोयल सभागृहात बसले होते आणि त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगायला हवे होते. यानंतर गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमारांना त्यांच्या नावाची कागदपत्रे सभागृहाच्या टेबलवर मांडायची होती, पण काही अडचण आल्यामुळे इतर मंत्री त्यांना समजावून सांगू लागले. त्यावर बिर्लांनी, एकमेकांना समजावून सांगू नका, असे म्हटले.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसom birlaओम बिर्ला