शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

'ती' मुले गणितात शाळकरी मुलांपेक्षा हुशार; संशोधनाने वाढवली पालकांची चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:02 IST

Education India: संशोधनानुसार, शाळकरी मुले शैक्षणिक गणितात चांगली असतात, तर भाजी मंडईतील मुले अवघड व्यवहार लवकर सोडवितात.

नवी दिल्ली : देशातील अनेक शाळकरी मुलांना साधी वजाबाकी येत नसल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यातच आता मुलांना शाळेत शिकवले जाणारे गणित आणि दैनंदिन जीवनात वापरले जाणारे गणित यात खूप अंतर असल्याचे समोर आले आहे. भाजी मंडईतील मुले ८०० ग्रॅम बटाटे आणि १.४ किलो कांद्याची किंमत काही सेकंदांत सांगू शकतात. मात्र हीच किंमत सांगण्यासाठी शाळेतील मुले कॅल्क्युलेटरची मदत घेत असल्याची बाब एका संशोधनात समोर आली आहे.

संशोधनानुसार, शाळकरी मुले शैक्षणिक गणितात चांगली असतात, तर भाजी मंडईतील मुले अवघड व्यवहार लवकर सोडवितात. मात्र, ते शालेय गणितात कमकुवत आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अॅस्थर डुफलो आणि अभिजित बॅनर्जी यांच्या टीमने हे संशोधन केले आहे.

दैनंदिन गणिताची कौशल्ये शाळेत उपयोगी पडू शकतात का आणि शाळेत शिकलेले गणित दैनंदिन जीवनात लागू होते का हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संशोधकांनी दिल्ली आणि कोलकात्याच्या भाजी मंडईतील १,४३६ रमुले आणि ४७१ शाळकरी मुलांचा अभ्यास केला.

शाळेत प्रवेश, पण...

भाजी मंडईत काम करणाऱ्या अनेक मुलांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्यांना जास्त शिकता आले नाही. यातील केवळ ३२ टक्के मुलांना तीन अंकी संख्येचा भागाकार करता आला.

अभ्यासात काय आढळले?

अभ्यासात १३ ते १५ वर्षाच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता. शाळेत जात असलेल्या एक टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रश्न सोडविण्यास जमले नाहीत. मात्र एक तृतीयांश मंडईतील मुलांनी हे प्रश्न अगदी सहज सोडविले.

मंडईतील मुले मानसिक शॉर्टकट वापरतात, तर शाळेत जाणारी मुले लिखित गणनेवर अवलंबून असतात. ही तफावत दूर करण्यात भारतातील शिक्षण व्यवस्था अपयशी ठरल्याचे संशोधकांचे मत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र