शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
2
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
3
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
4
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
5
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
6
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
7
डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
8
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
9
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
10
रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
11
AI मुळे नोकऱ्या जाणार का? आनंद महिंद्रा यांनी मांडले 'ब्रेन गेन'चे सूत्र; नव्या वर्षात युवकांना दिला यशाचा मंत्र
12
Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं! न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
13
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
14
Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
15
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
16
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
17
12 Grape Theory: घड्याळाचे १२ ठोके अन् १२ द्राक्ष; नवं वर्षात चमकेल नशीब; काय आहे 'ग्रेप थ्योरी', तरुणाईला लावलं वेड
18
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
19
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
20
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:03 IST

'समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये.'

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी भेदभाव आणि अलगावाच्या भावना संपवण्याचे आवाहन केले आहे. छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील सोनपैरी गावात झालेल्या हिंदू संमेलनात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मंदिर, मठ, तलाव, विहिरी तसेच स्मशानभूमी या सर्व सुविधा कोणीही बांधल्या असल्या तरी त्या सर्व हिंदूंकरिता खुल्या असाव्यात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भागवत म्हणाले की, लोकांचे मूल्यांकन जात, संपत्ती, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारे होऊ नये. हा देश सर्वांचा आहे आणि ही भावना म्हणजेच खरा सामाजिक सलोखा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सामाजिक सलोख्यावर भर

आपल्या भाषणात सरसंघचालकांनी सांगितले की, सामाजिक सलोख्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे भेदभाव आणि विभाजनाच्या मानसिकतेला दूर करणे. आपण ज्या परिसरात राहतो, तिथे सर्व हिंदू आपले मित्र असले पाहिजेत. जात, भाषा, प्रांत किंवा संप्रदाय यांवरून जे फरक दाखवले जातात, त्या सर्व लोकांशी मैत्रीचे नाते निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.

आयुष्यात अमलात आणावयाच्या पाच गोष्टी

भागवत पुढए म्हणाले की, केवळ आध्यात्मिक चर्चांपुरते विचार मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे आवश्यक आहे. त्यांनी पाच महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या

सामाजिक सलोखा जोपासणे

कुटुंबव्यवस्था मजबूत करणे

स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार

शिस्तबद्ध नागरिक जीवन

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी

मंदिर, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्वांसाठी

संघप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की, समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये. सामाजिक कार्य म्हणजे एकतेचा प्रयत्न असतो, संघर्षाचा नव्हे, असे त्यांनी नमूद केले.

कुटुंब, एकाकीपणा आणि समाज

एकाकीपणावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, जेव्हा व्यक्ती एकटी पडते तेव्हा ती चुकीच्या सवयींकडे वळण्याची शक्यता वाढते. कुटुंबातील नियमित संवाद आणि एकमेकांशी बोलणे हे यावर प्रभावी उपाय ठरू शकते. देश धोक्यात असेल, तर कुटुंबही सुरक्षित राहू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पर्यावरण रक्षणाचा संदेश

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त करत भागवत यांनी पाणी बचत, पावसाचे पाणी साठवणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि अधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. घरापासूनच पर्यावरण संरक्षणाची सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : India Belongs to All; No Discrimination: Mohan Bhagwat.

Web Summary : Mohan Bhagwat calls for ending discrimination based on religion, caste, language, region. He emphasizes social harmony, equal access to facilities, strong families, swadeshi, discipline, and environmental protection. He urged people to start environmental conservation from home.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघChhattisgarhछत्तीसगड