शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:03 IST

'समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये.'

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी भेदभाव आणि अलगावाच्या भावना संपवण्याचे आवाहन केले आहे. छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील सोनपैरी गावात झालेल्या हिंदू संमेलनात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मंदिर, मठ, तलाव, विहिरी तसेच स्मशानभूमी या सर्व सुविधा कोणीही बांधल्या असल्या तरी त्या सर्व हिंदूंकरिता खुल्या असाव्यात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भागवत म्हणाले की, लोकांचे मूल्यांकन जात, संपत्ती, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारे होऊ नये. हा देश सर्वांचा आहे आणि ही भावना म्हणजेच खरा सामाजिक सलोखा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सामाजिक सलोख्यावर भर

आपल्या भाषणात सरसंघचालकांनी सांगितले की, सामाजिक सलोख्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे भेदभाव आणि विभाजनाच्या मानसिकतेला दूर करणे. आपण ज्या परिसरात राहतो, तिथे सर्व हिंदू आपले मित्र असले पाहिजेत. जात, भाषा, प्रांत किंवा संप्रदाय यांवरून जे फरक दाखवले जातात, त्या सर्व लोकांशी मैत्रीचे नाते निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.

आयुष्यात अमलात आणावयाच्या पाच गोष्टी

भागवत पुढए म्हणाले की, केवळ आध्यात्मिक चर्चांपुरते विचार मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे आवश्यक आहे. त्यांनी पाच महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या

सामाजिक सलोखा जोपासणे

कुटुंबव्यवस्था मजबूत करणे

स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार

शिस्तबद्ध नागरिक जीवन

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी

मंदिर, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्वांसाठी

संघप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की, समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये. सामाजिक कार्य म्हणजे एकतेचा प्रयत्न असतो, संघर्षाचा नव्हे, असे त्यांनी नमूद केले.

कुटुंब, एकाकीपणा आणि समाज

एकाकीपणावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, जेव्हा व्यक्ती एकटी पडते तेव्हा ती चुकीच्या सवयींकडे वळण्याची शक्यता वाढते. कुटुंबातील नियमित संवाद आणि एकमेकांशी बोलणे हे यावर प्रभावी उपाय ठरू शकते. देश धोक्यात असेल, तर कुटुंबही सुरक्षित राहू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पर्यावरण रक्षणाचा संदेश

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त करत भागवत यांनी पाणी बचत, पावसाचे पाणी साठवणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि अधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. घरापासूनच पर्यावरण संरक्षणाची सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : India Belongs to All; No Discrimination: Mohan Bhagwat.

Web Summary : Mohan Bhagwat calls for ending discrimination based on religion, caste, language, region. He emphasizes social harmony, equal access to facilities, strong families, swadeshi, discipline, and environmental protection. He urged people to start environmental conservation from home.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघChhattisgarhछत्तीसगड