शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:18 IST

ओवेसी म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे."

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला सात विकेटने हरवून शानदार विजय मिळवला. मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये उडालेल्या लष्करी संघर्षानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यातील भारताच्या विजयाने क्रिकेट प्रेमिंना तर खुश केलेच. शिवाय, या सामन्याने राजकारणही तापले होते. यातच आता, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भारताने सर्वत्र विजय मिळवायला हवा, मग क्रिकेटचा सामना असो अथवा दहशतवाद्यांना प्रत्युत्तर. पण जे आपल्या मुलींना विधवा आणि मुलांना अनाथ बनवत आहेत, त्यांच्या सोबत खेळणे, हे विजयाचे परिमाण असू शकत नाही. हा विजय असू शकत नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत, २६ भारतीय नागरिकांचे जीवन अधिक मौल्यवान आहेत की क्रिकेट सामन्यातून मिळवलेले कोट्यवधी रुपये? असा प्रश्नही ओवेसी यांनी यावेळी सरकारला केला.

भाजप आणि देशभक्ती -दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या, 'पानी और खून एक साथ नहीं बह सकते, आतंक और बातचीत संभव नहीं', या विधानाची आठवण करून देत ओवेसी म्हणाले, "भाजप आपल्या देशभक्तीच्या धोरणासंदर्भात क्रिकेट येताच तडजोड करतो. ते म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे.

पहलगाम दहशतवादी हल्ला - गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान तसेच पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले. या लष्करी कारवाईत क्षेपणास्त्रे, ड्रोन आदींचा वापर करण्यात आला. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा