शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:40 IST

अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला.

'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात भारताने दिलेले धक्के आता पाकिस्तान स्वीकारू लागला आहे. काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी हल्ल्या झाल्याचे मान्य केले. यावेळी दोन देशांची नावे घेत त्या देशांनी भारतासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. भारताने गातील कोणत्याही नेत्याने भारताला संघर्षविराम थांबवण्यासाठी सांगितले नव्हते असे स्पष्ट केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'ची सुरुवात केली होती.

अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला.

भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!

१० मे रोजी रुबियो यांचा त्यांना सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी फोन आला होता. दार यांच्या म्हणण्यानुसार, तेव्हा अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले होते की, भारत संघर्षविरामासाठी तयार आहे, पण पाकिस्तान मानेल का? दार यांनी सांगितले, 'मी म्हटले की आम्हाला कधीही युद्ध नको आहे.'

दार म्हणाले, नंतर फैसल यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि भारताशी बोलण्यासाठी परवानगी मागितली होती. तसेच दावा केला की नंतर फैसल यांनी पुष्टी दिली होती की युद्धविरामावर सहमती झाली आहे.

दरम्यान, भारताने आधीच युद्धविरामात कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका नव्हती असे सांगितले आहे. जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी सांगितले नाही. पाकिस्तानने ऑपरेशन थांबवण्याची विनंती केली होती, असा दावा भारताने केला होता.

याआधी जूनमध्ये भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले होते की, भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम दोन्ही देशांच्या चर्चेतून झाला आहे,असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

मिस्री यांनी सांगितले होते, 'पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले आहे की या काळात भारत आणि अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेची मध्यस्थी अशा विषयांवर कोणतीही चर्चा झाली नाही.'

त्यांनी सांगितले होते, 'लष्करी कारवाईचा संघर्षविराम भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट झाला होता आणि पाकिस्तानच्या विनंतीवरून झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी भर देऊन सांगितले आहे की भारताने पूर्वीही मध्यस्थी स्वीकारली नव्हती आणि पुढेही कधीही स्वीकारणार नाही.'

ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांच्या हत्येचा बदला म्हणून भारताने सात मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, यामध्ये पाकिस्तान आणि त्याच्या ताब्यातील काश्मीरमधील दहशतवादी रचनांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये चार दिवस तीव्र संघर्ष झाला आणि १० मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्याच्या सहमतीसह हा संघर्ष संपला.

English
हिंदी सारांश
Web Title : Two countries tried to mediate during 'Operation Sindoor': Pakistan's claim.

Web Summary : Pakistan claims US & Saudi Arabia offered to mediate during 'Operation Sindoor' after India retaliated to Pahalgam attack. India denies third-party involvement in ceasefire, stating it was a bilateral decision following Pakistan's request to end the military action.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत