शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:21 IST

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात सर्व राजकीय पक्षांशी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या सारख्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी घोषित केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी पटकवणार याचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी सोपी नसेल त्यामुळे भाजप निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी युपीएला सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं होतं. त्यावेळी देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट निर्माण होती. या लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे. 

उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत, सभांपासून रॅलीपर्यंत सर्वच बाबी भारतीय जनता पार्टी नियोजनबध्द पद्धतीने करत आहे. मात्र निवडणुकीत असे काही मुद्दे आहे जे नरेंद्र मोदी यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात 

1- राफेलवरुन रणकंदन काँग्रेसकडून राफेल विमान खरेदीचा मुद्दा निवडणुकीसाठी कळीचा मुद्दा ठरु शकतो, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीमध्ये आक्रमकरित्या राफेल मुद्दा मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले आहे. राफेल विमान खरेदीमध्ये घोटाळा झाला असून पंतप्रधान यांनी राफेल करारातून अनिल अंबानी यांचे खिसे भरण्याचं काम केले असा आरोप मोदींवर होत आहे. विमान बनविण्याचे कोणतंही ज्ञान आणि अनुभव नसताना मोदी सरकारने अनिल अंबानी यांच्या कंपनीला फायदा होईल म्हणून हे कंत्राट दिले. 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांच्या खिशात घातले, चौकीदाराने देशाला लुटले असा आरोप करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

2 - नोटाबंदी आणि जीएसटी  देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यत: काळा पैसा आणि दहशतवाद संपविण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी असे ऐतिहासिक निर्णय घेतले. नोटाबंदीने काळा पैशाला चाप बसला आणि जीएसटीमुळे करप्रणालीमध्ये सुलभता आली असा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र विरोधकांनी नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, जीएसटीमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले असा आरोप केला. 

3 - कर्जबुडवे उद्योगपती विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योजकांनी देशातील बॅंकांना लुटून परदेशात पळून गेले. बॅकांचे कर्ज बुडवून उद्योगपती परदेशात पळून गेले हे मोदी सरकारचे अपयश आहे. नीरव मोदी आणि विजय माल्ल्या पळून जाण्यामागे भाजपमधील मंत्र्यांचा हात आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे. 

4 - शेतकरी आणि बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी पिकांचा हमीभाव, शेतकरी कर्जमाफी आणि नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, देशात बेरोजगारी वाढली अशा विरोधकांच्या मुद्द्यावरून विरोधक निवडणुकीच्या काळात आक्रमक होणार आहेत. 

5- विरोधी पक्षांची महाआघाडी विविध राज्यांमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, मायावती, अखिलेश यादव यांच्या सारखे विविध पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येऊन महाआघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर वैरी असलेले सपा-बसपा यांनी आघाडी केल्याने उत्तर प्रदेशात त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकRafale Dealराफेल डीलDemonetisationनिश्चलनीकरणFarmerशेतकरीGSTजीएसटीcongressकाँग्रेस