शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोठा खेळ होणार, नितीश कुमारांचा उद्धव ठाकरे करणार? भाजपा नेत्यांच्या दाव्यानंतर बिहारमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:06 IST

Nitish Kumar : भाजपाच्या दोन नेत्यांनी जेडीयूचे मंत्री आणि आमदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे लवकरच बिहारमध्ये मोठा राजकीय खेळ होऊ शकतो, असा दावा केल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

 पाटणा - नव्या वर्षाला सुरुवात झाली असून, या वर्षात कोणत्या घडामोडी घडती याचा राजकीय वर्तुळातून अंदाज घेण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपाच्या दोन नेत्यांनी जेडीयूचे मंत्री आणि आमदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे लवकरच बिहारमध्ये मोठा राजकीय खेळ होऊ शकतो, असा दावा केल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  बघा खरमास (पौष महिना) संपू द्या, त्यानंतर काय काय होतं ते बघत राहा, असा दावा भाजपाच्या दोन नेत्यांनी केला आहे.

बिहारमधील विरोधीपक्ष नेते सम्राट चौधरी यांनी सांगितले की, जनता दल युनायटेडचा पाया हलला आहे. त्यांचा मतदार भाजपाकडे वळला आहे. त्यामुळे जेडीयूचे अनेक नेते त्रस्त आहेत. तसेच काय करावं, हे त्यांना समजत नाही आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर पर्याय म्हणून भाजपा आहे. कारण आमदारकीपासून खासदारकीपर्यंत आरजेडीविरोधातच जिंकून आले होते. आता नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्याकडे सत्ता सोपवण्याची तयारी करत आहेत. मात्र जेडीयूचे आमदार आणि खासदार यासाठी तयार नाही आहेत. त्यांच्यासमोर भाजपाशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही आहे. कारण त्यांच्यासाठी भाजपा मित्रपक्ष राहिलेला आहे. थोडी वाट पाहा लवकरच बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद यांनीही जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. लवकरच जेडीयूमध्ये मोठी फुट पडेल, असे त्यांनी म्हटले होते. तेव्हापासून बिहारमध्ये राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.

मात्र भाजपाचे हे दावे जेडीयूने फेटाळले आहे. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी भाजपावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, भाजपा ज्याच्या हात पकडून बिहारच्या राजकारणात पुढे आला. त्यालाच तोडण्याचा प्रयत्न आज करत आहे. यापेक्षा अधिक हास्यास्पद काय असू शकतं. जेडीयूचा पाया एवढा भक्कम आहे की त्याला तोडणे सोडा कुणी हलवूही शकत नाही. भाजपा नितीश कुमार यांची मोहीम आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरली आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांमध्ये निर्माण होत असलेल्या भीतीला रोखण्यासाठी अशा प्रकारचे दावे करत आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा