शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर उभारणीतील अडथळे दूर; फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 05:52 IST

अयोध्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये १८ फेरविचार याचिका दाखल झाल्या होत्या.

नवी दिल्ली : अयोध्या विवादाच्या निकालाबाबत दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका तथ्यहीन असल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे अयोध्येत राममंदिराच्या उभारण्याच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यायालयीन दालनात या फेरविचार याचिकांची सुनावणी झाली.या खंडपीठामध्ये न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. संजीव खन्ना यांचाही समावेश होता. अयोध्या विवाद खटल्यांमध्ये पक्षकार असलेल्यांच्याच फेरविचार याचिका न्यायालयाने विचारात घेतल्या.

अयोध्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये १८ फेरविचार याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातील नऊ याचिका या वादाच्या खटल्यातील पक्षकारांनी व अन्य नऊ याचिका त्रयस्थ व्यक्तिंनी केलेल्या होत्या. या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्या खुल्या सुनावणीची याचिकादारांनी केलेली मागणीही रद्दबातल झाली आहे.

अयोध्येमधील वादग्रस्त भूमीवर राममंदिर बांधण्यास परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्याचबरोबर अयोध्येत मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना ५ एकर पर्यायी जमीन देण्यास यावी असेही न्यायालयाने म्हटले होते.या निकालाबाबत दोन डिसेंबर रोजी पहिली फेरविचार याचिका दाखल झाली होती. त्यानंतर काही दिवसांत आणखी सतरा फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या.

अयोध्या विवादाच्या निकालाचा मर्यादित स्वरुपात फेरविचार होण्यासाठी अखिल भारत हिंदू महासभेनेही याचिका सादर केली होती.या सर्व फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या ४० व्यक्तींमध्ये इतिहासकार इरफान हबीब, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनाईक, सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर, नंदिनी सुंदर, जॉन दयाल यांचाही समावेश होता.

ही तर दुर्दैवी घटना - जफरयाब जिलानीसर्वोच्च न्यायालयाने आमच्या फेरविचार याचिका फेटाळून लावल्या ही दुर्दैवी घटना आहे अशी प्रतिक्रिया आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, यानंतर आमचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल लगेचच काही सांगता येणार नाही

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय