शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

राममंदिर उभारणीतील अडथळे दूर; फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 5:52 AM

अयोध्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये १८ फेरविचार याचिका दाखल झाल्या होत्या.

नवी दिल्ली : अयोध्या विवादाच्या निकालाबाबत दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका तथ्यहीन असल्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे अयोध्येत राममंदिराच्या उभारण्याच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यायालयीन दालनात या फेरविचार याचिकांची सुनावणी झाली.या खंडपीठामध्ये न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. संजीव खन्ना यांचाही समावेश होता. अयोध्या विवाद खटल्यांमध्ये पक्षकार असलेल्यांच्याच फेरविचार याचिका न्यायालयाने विचारात घेतल्या.

अयोध्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये १८ फेरविचार याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातील नऊ याचिका या वादाच्या खटल्यातील पक्षकारांनी व अन्य नऊ याचिका त्रयस्थ व्यक्तिंनी केलेल्या होत्या. या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्या खुल्या सुनावणीची याचिकादारांनी केलेली मागणीही रद्दबातल झाली आहे.

अयोध्येमधील वादग्रस्त भूमीवर राममंदिर बांधण्यास परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्याचबरोबर अयोध्येत मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना ५ एकर पर्यायी जमीन देण्यास यावी असेही न्यायालयाने म्हटले होते.या निकालाबाबत दोन डिसेंबर रोजी पहिली फेरविचार याचिका दाखल झाली होती. त्यानंतर काही दिवसांत आणखी सतरा फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या.

अयोध्या विवादाच्या निकालाचा मर्यादित स्वरुपात फेरविचार होण्यासाठी अखिल भारत हिंदू महासभेनेही याचिका सादर केली होती.या सर्व फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या ४० व्यक्तींमध्ये इतिहासकार इरफान हबीब, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनाईक, सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर, नंदिनी सुंदर, जॉन दयाल यांचाही समावेश होता.

ही तर दुर्दैवी घटना - जफरयाब जिलानीसर्वोच्च न्यायालयाने आमच्या फेरविचार याचिका फेटाळून लावल्या ही दुर्दैवी घटना आहे अशी प्रतिक्रिया आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, यानंतर आमचे पुढचे पाऊल काय असेल याबद्दल लगेचच काही सांगता येणार नाही

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय