शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:21 IST

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था (आयबीपीएस) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीची कोणतीही घटना समोर आलेली नाही, असे केंद्र सरकारतर्फे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले.

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, “अलीकडेच राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ५ मे २०२४ रोजी नीट-यूजी परीक्षा ओएमआर (पेन आणि पेपर) पद्धतीने घेतली होती. त्यात कथित अनियमिततेची काही प्रकरणे समोर आली. पुनरावलोकनानंतर २२ जून २०२४ रोजी हे प्रकरण सर्वसमावेशक तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवण्यात आले.”

“गेल्या दोन वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भरती परीक्षांमध्ये पेपर फुटल्याची एकही घटना घडलेली नाही,” असा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.  सार्वजनिक परीक्षांमधील अनुचित मार्ग रोखण्यासाठी सरकारने सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांना प्रतिबंध) कायदा, २०२४ लागू केला आणि त्यानंतर या कायद्याअंतर्गत नियमही अधिसूचित केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग