शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:50 IST

खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी राज्यसभेत, महाकुंभ मेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत "हजारो" लोकांचा मृत्यू झाला, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर, सभागृहात एक गदारोळ झाला. यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "खर्गे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, वरिष्ठ सभागृहात झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, महाकुंभ मेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत 'हजारो' लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले आणि सभागडहात गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर खर्गे लगेचच म्हणाले की, "हा माझा अनुमान आहे. जर हे खरे नसेल, तर आपण (सरकारने) खरा आकजा सांगाला हवा. मी कुणालाही दोष देण्यासाठी 'हजारो' शब्द वापरला नाही. पण किमान किती लोकांचा मृत्यू झाला? याची माहिती तरी द्या. जर मी चुकलो असेल तर माफीही मागेन. त्यांनी किती लोक मारले गेले, किती बेपत्ता आहेत याची माहिती दियायला हवी."

काय म्हणाले होते खर्गे? - गेल्या 29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर स्नानावेळी चेंगराचेंगरी झाली होती. यात सरकारी आकडेवारीनुसार, ३० जणांचा मृत्यू झाला होता. खर्गे म्हणाले, "मी महाकुंभ मेळ्यात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. कुंभ मेळ्यात मृत्यू पावलेल्या हजारो लोकांना...," यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला.

धनखड म्हणाले, विधान मागे घ्या -यासंदर्भात सभापती धनखड यांनी खर्गे यांना त्यांचे विधान मागे घेण्याचे आवाहन केले. धनखड म्हणाले, "विरोधी पक्षनेत्यांनी हजारोंच्या संख्येने आकडे दिले आहेत... मी त्यांना आवाहन करतो की या सभागृहात जे काही बोलले जाते ते अत्यंत महत्त्वाचे आहे.' आपण असे काही बोलला आहात की, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. येथून जाणारा संदेश, मग त्याचे भलेही खंडन झालेले असो, तो संपूर्ण जगात जातो.’’

यावर खर्गे म्हणाले, आपम कुणालाही दोषी ठरवण्यासाठी हा आकडा बोललेलो नाही. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेKumbh Melaकुंभ मेळाcongressकाँग्रेसDeathमृत्यू