शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

'समोर इंडिया आघाडी होती, म्हणून मोदींना संविधानापुढे झुकावे लागले', राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:38 IST

'भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे.'

Rahul Gandhi attack PM Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी(27 जानेवारी) मध्य प्रदेशातील महू येथे जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी संविधानाविषयी बोलतांना भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यघटना रद्द करण्याची भाषा वापरली होती. आम्हाला 400 जागा मिळाल्या तर संविधान बदलू, असे ते म्हणाले होते. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते समोर उभे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानापुढे झुकावे लागले,' अशी टीका राहुल गांधींनी केली.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी पुढे म्हणतात, 'भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एका बाजूला संविधानावर विश्वास ठेवणारी आणि त्यासाठी लढणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस-भाजप आहे, जी संविधानाच्या विरोधात आहेत, ती विचारधारा संविधान कमकुवत करू इच्छिते. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, त्यात भारताची हजारो वर्षे जुनी विचारसरणी आहे. त्यात आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचा आवाज आहे. काही दिवसांपूर्वी मोहन भागवत म्हणाले होते की, भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ते खोटे स्वातंत्र्य होते. हा थेट संविधानावर हल्ला आहे.' 

कोट्यधीशांना सर्व कंत्राटे दिली 

'देशात दलित, आदिवासी आणि मागासलेल्यांसाठी काहीही उरणार नाही. सगळी कंत्राटं दोन-तीन अब्जाधीशांना दिली जातात. भारतातील सर्व नागरिक समान आहेत, असे संविधानात लिहिले आहे. प्रत्येक भारतीयाला स्वप्न पाहण्याचा आणि भविष्य घडवण्याचा अधिकार असायला हवा, असे संविधानात लिहिले आहे. भारतात आज 50 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. भाजपची नोटाबंदी आणि जीएसटी भारतातील गरीब जनतेला उद्ध्वस्त करण्याचे साधन आहे. जीएसटी भारतातील गरीब लोक भरतात. तर, पंतप्रधान मोदींनी अब्जाधीशांची 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली,' असा दावाही राहुल गांधींनी यावेळी केला.

90 टक्के लोकसंख्येला प्रतिनिधित्व नाही

राहुल पुढे म्हणतात, 'आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलची किंमत कमी होत असली तरी भारतात पेट्रोलचे दर वाढतच आहेत. संविधानापूर्वी या देशात गरिबांना कोणतेही अधिकार नव्हते. स्वातंत्र्यापूर्वी गरिबांना कोणतेही अधिकार नव्हते. भाजप-आरएसएसला स्वातंत्र्यापूर्वीचा भारत हवा आहे. या देशात तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. रोजगाराशिवाय पदवीचा कागद फक्त कचरा आहे. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत, म्हणून त्यांना मंदिरात जाऊ दिले जात नाही. राम मंदिराच्या कार्यक्रमात कोणी दलित मागासलेला दिसला का? राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनालाही उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. देशातील 90 टक्के लोकसंख्येला प्रतिनिधित्व नाही, हा अन्याय नाही का?' असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा