शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Vidarbha: स्वतंत्र विदर्भाचा प्रस्तावच नाही, केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 06:46 IST

Vidarbha News: महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातूनविदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले. स्वतंत्र विदर्भ स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत नसल्याचे उत्तर आज लोकसभेत देण्यात आले.

गेली अनेक वर्षे विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी काही पक्ष व संघटना करीत आहेत. या मागणीसाठी त्या भागांत अनेक आंदोलनेही झाली. भाजपही काही वर्षांपूर्वी ही मागणी करीत होता. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण त्या सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली वा अमान्य केली, असे आज लोकसभेत दिलेल्या उत्तरामुळे उघड झाले आहे. अशोक नेते (भाजप) यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की, स्वतंत्र राज्याचा प्रस्ताव केंद्रापुढे नाही. तसा प्रस्ताव आहे का व त्यासंदर्भात केंद्र सरकारने काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न विचारला होता. काही व्यक्ती, संस्था, संघटनांनी  स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी निवेदने दिली आहेत. 

विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोळसा, खनिज संपत्ती, कापूस, जंगल संपत्ती आहे, पण प्रक्रिया उद्योग विदर्भाबाहेर आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाच्या विकासाला गती मिळणार नाही असे माझे मत आहे. त्यामुळे मी त्याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यावर अजून सभागृहात चर्चा होणे बाकी आहे.- अशोक नेते, खासदार, गडचिरोली-चिमूर 

टॅग्स :Vidarbhaविदर्भCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र