शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

Vidarbha: स्वतंत्र विदर्भाचा प्रस्तावच नाही, केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 06:46 IST

Vidarbha News: महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातूनविदर्भाला वेगळे काढून, त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे मंगळवारी लोकसभेत स्पष्ट झाले. स्वतंत्र विदर्भ स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत नसल्याचे उत्तर आज लोकसभेत देण्यात आले.

गेली अनेक वर्षे विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी काही पक्ष व संघटना करीत आहेत. या मागणीसाठी त्या भागांत अनेक आंदोलनेही झाली. भाजपही काही वर्षांपूर्वी ही मागणी करीत होता. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण त्या सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली वा अमान्य केली, असे आज लोकसभेत दिलेल्या उत्तरामुळे उघड झाले आहे. अशोक नेते (भाजप) यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की, स्वतंत्र राज्याचा प्रस्ताव केंद्रापुढे नाही. तसा प्रस्ताव आहे का व त्यासंदर्भात केंद्र सरकारने काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न विचारला होता. काही व्यक्ती, संस्था, संघटनांनी  स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी निवेदने दिली आहेत. 

विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोळसा, खनिज संपत्ती, कापूस, जंगल संपत्ती आहे, पण प्रक्रिया उद्योग विदर्भाबाहेर आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाच्या विकासाला गती मिळणार नाही असे माझे मत आहे. त्यामुळे मी त्याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यावर अजून सभागृहात चर्चा होणे बाकी आहे.- अशोक नेते, खासदार, गडचिरोली-चिमूर 

टॅग्स :Vidarbhaविदर्भCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र