शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीचे पुरावे देण्याची गरज नाही

By admin | Updated: December 2, 2015 04:27 IST

भारताच्या १२५ कोटी जनतेच्या देशभक्तीबद्दल कोणालाही संशय नाही. त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि कोणी देशभक्तीचे पुरावे देण्याचीही गरज नाही

नवी दिल्ली : भारताच्या १२५ कोटी जनतेच्या देशभक्तीबद्दल कोणालाही संशय नाही. त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि कोणी देशभक्तीचे पुरावे देण्याचीही गरज नाही, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केले.राज्यसभेत दोन दिवस झालेल्या संविधान प्रतिबद्धता चर्चेस मोदींनी पॅरिसहून परत येताच उत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, बिखरने के लिए बहाने तो बहुत मिल जायेंगे... जोडने के अवसर खोजना हमारा दायित्व है। तू तू.. मै मै.. करून देशाचे राजकारण चालत नाही. अत्याचार, अनाचार हा देशावर लागलेला कलंक आहे. समाजातले सौहार्द आणि सामंजस्य टिकवण्यासाठी समतेबरोबर ममतेचीही आवश्यकता आहे. त्यासाठी समभावाबरोबर आपण ममभावाचाही पुरस्कार केला पाहिजे.मोदी म्हणाले की, आपली राज्यघटना केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून सामाजिक प्रेरणेचाही दस्तऐवज आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे महत्त्व वाटावे, यासाठीच संविधानाचा उत्सव आपण संसदेत साजरा केला. संविधान सभेला राज्यघटनेची निर्मिती करताना बऱ्याच दबावाचा सामना करावा लागला असेल. अनेक प्रकारचे विचार व्यक्त झाले असतील. तरीही सर्वांचा साकल्याने विचार करून एक सर्वश्रेष्ठ राज्यघटना घटनेच्या शिल्पकारांनी आम्हाला प्रदान केली. याची जाणीव करून देत पंतप्रधान म्हणाले, घटनेचा मसुदा तयार करण्याच्या समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, त्यांचे १२५वे जयंती वर्ष आपण साजरे करीत आहोत. तथापि संविधान सभेत काँग्रेसचे अनेक महान नेतेही होते. आम्हाला त्यांचाही अभिमान वाटतो. आमच्यात ही हिंमत आहे की सकारात्मक नजरेने आम्ही त्यांच्या योगदानाकडे पाहतो. त्या सर्वांना नमन करण्यासाठीच संसदेत संविधान दिन आपण साजरा केला. या वेळी विशेष जोर देत पंतप्रधान म्हणाले, संसदेत पक्ष आणि विपक्ष अशा भूमिका वठवताना आपल्या सर्वांकडून कधीतरी निष्पक्ष वागण्याचीही अपेक्षा आहे. श्रेष्ठ लोक जे काम करतात, लोक त्यांचे अनुकरण करतात. नियतीने आपल्यावरही काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. संसदेची दोन्ही सभागृहे नवा आदर्श तेव्हाच निर्माण करू शकतील, जेव्हा परस्पर सहकार्याने या सभागृहांचे कामकाज चालेल.औद्योगिकीकरणाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन उद््धृत करताना पंतप्रधान म्हणाले, पददलित व वंचित समाजाकडे जमीन नव्हती. सन्मानाने त्यांची उपजीविका कशी चालेल, याचा विचार करताना बाबासाहेब म्हणाले होते की, भारताचे व्यापक औद्योगिकीकरण हाच कृषी समस्येचा उपाय आहे, कारण गरिबांना रोजगार मिळवून देण्याची मोठी क्षमता त्यात आहे. त्यांचे तेच विचार आजही महत्त्वाचे आहेत. संधीहिनाला संधी मिळवून देणे आपले कर्तव्यच आहे. मॅक्स मुल्लरने भारताविषयी व्यक्त केलेले विचार उद्धृत करीत, भाषणाच्या अखेरीला पंतप्रधान म्हणाले, जगाच्या पाठीवर एकच स्वर्ग आहे, तो म्हणजे भारत! देशासमोर जी आव्हाने आहेत, त्यांचा मुकाबला सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला करावा लागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)