शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘ऑनलाईन’साठी सुविधा नाही; मुख्याध्यापकाने सुरू केले ‘लाऊडस्पीकर वर्ग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 02:32 IST

ते चक्क लाऊडस्पीकरवर यशस्वीरीत्या वर्ग घेत आहेत. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण मुख्याध्यापक गांधी यांनी सिद्ध केली आहे.

डुमका : ‘शिक्षक जग बदलू शकतो’, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय झारखंडच्या डुमका जिल्ह्यातील मुख्याध्यापक श्यामकिशोर सिंग गांधी यांनी दिला आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या त्यांच्या शाळेत २०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. गरिबीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना स्मार्टफोन घेणे परवडणारे नाही. त्यामुळे आॅनलाईन वर्ग येथे शक्य नाहीत. यावर गांधी यांनी स्मार्ट उपाय शोधला. ते चक्क लाऊडस्पीकरवर यशस्वीरीत्या वर्ग घेत आहेत. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण मुख्याध्यापक गांधी यांनी सिद्ध केली आहे.कोविड-१९ साथीमुळे सर्व ठिकाणच्या शाळा बंद आहेत. अनेक शाळांनी मोबाईलवर आॅनलाईन वर्ग सुरू केले आहेत. तथापि, दुर्गम भारतात स्मार्ट फोनचाच अभाव असल्यामुळे आॅनलाईन वर्गही शक्य नाहीत. त्यामुळे बहुतांश सर्वच ग्रामीण भागात आॅनलाईन वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत. श्यामकिशोर सिंग गांधी यांनी मात्र या अभावावर यशस्वी मात केली आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यातील बनकाठी गावातील माध्यमिक शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. मुलांना शिकवायचेच या ध्येयाने पछाडलेल्या गांधी यांनी अनेक लाऊडस्पीकर लावून शाळा सुरू केली. १६ एप्रिलपासून ते दररोज दोन तास लाऊडस्पीकरवरील शाळा भरवीत आहेत. विविध ठिकाणची झाडे आणि भिंतींना लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरजवळ बसून विद्यार्थी या अनोख्या शाळेत धडे गिरवत आहेत. कोरोना विषाणूच्या साथीचा फैलाव झाल्यानंतर मार्चच्या मध्यापासून संपूर्ण भारतातील हजारो शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. येथील शाळा मात्र अनोख्यापद्धतीने सुरू आहे.गांधी यांनी सांगितले की, गावात ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी लाऊडस्पीकर बसविण्यात आले आहेत. पाच शिक्षक आणि दोन सहशिक्षक वर्गात बसून माईकवरून शिकवितात. आता शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही याअनोख्या शाळेत रुळले आहेत.गांधी यांनी सांगितले की, पहिली ते आठवी या वर्गात २४६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २०४ विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाहीत. त्यामुळे आम्ही लाऊडस्पीकरचा पर्याय निवडला. सकाळी १० वा. आमची शाळा सुरू होते.विद्यार्थ्यांना न समजलेल्या विषयांचा निपटारा करण्याचीही सोय शाळेने केली आहे. गांधी यांनी सांगितले की, एखाद्या विद्यार्थ्याला काही शंका असेल अथवा त्याचे काही प्रश्न असतील तर तो गावातील जवळच्या एखाद्याच्या मोबाईलवरून आमच्यापर्यंत पोहोचवतो. संबंधित शिक्षक दुसऱ्या दिवशी लाऊडस्पीकरवरून या शंकांचे निरसन करतात.गांधी यांनी सांगितले की, हे प्रारूप काम करीत आहे. जे शिकविले जात आहे, ते विद्यार्थी उत्तम प्रकारे ग्रहण करीत आहेत. गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले की, आमच्या गावातील विद्यार्थी ग्रहणक्षम आहेत. नव्या पद्धतीच्या अभ्यासाचा ते आनंद घेत आहेत.डुमका जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षणाधिकारी पूनम कुमारी यांनी मुख्याध्यापक गांधी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी सांगितले की, येथील सर्व २,३१७ सरकारी शाळांनी या प्रारूपाचा स्वीकार करून शिक्षण कार्य सुरू ठेवायला हवे. असे वर्ग सुरू केल्यास लॉकडाऊन उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. लाऊडस्पीकरवरून वर्ग घेण्याचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. डुमका जिल्ह्यातील सर्व शाळांनी या संकल्पनेचा स्वीकार करायला हवा. ही पद्धती समजून घेण्यासाठी आपण लवकरच त्या शाळेला भेट देऊ.>इंटरनेट कनेक्टिव्हिटीचीही समस्यामोठी शहरे आणि नगरेही लॉकडाऊनचा सामना करताना संघर्ष करीत असली तरी त्यांचा संघर्ष हा दुर्गम आणि ग्रामीण भागाएवढा कठोर नाही. बहुतांश शहरांत, तसेच छोट्या नगरांत आॅनलाईन वर्ग नियमित सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र आॅनलाईन वर्ग सुरू करण्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. येथील मुख्य समस्या स्मार्टफोन आणि संगणकांची आहे. याशिवाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहेच. फोन अथवा संगणक असूनही कनेक्टिव्हिटीअभावी आॅनलाईन वर्ग सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नुसतेच बसून आहेत. त्यांच्यासाठीमुख्याध्यापक गांधी यांचेप्रारूप उत्तम पर्यायठरू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या