शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मोदींवरील अविश्वास आता संसदेबाहेरही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:37 IST

देशभर भाजपा व केंद्र सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरुद्ध मांडलेला अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला असला तरी आता संसदेबाहेर म्हणजेच देशभर भाजपा व केंद्र सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे.त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील प्रचंड जाहीर सभेत ‘भाजपा हटाव, देश बचाव’चा नारा दिला, तर तेलगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीतच पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले.देशभरात सभा, मेळावे, मोर्चे व पत्रकार परिषदा घेऊ न मोदी यांना व त्यांच्या सरकारला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखायला सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात विरोधी पक्षांचे नेते पश्चिम बंगालमध्ये एकत्र येणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी यांनी लोकसभेत दिलेली माहिती चुकीची असल्याचे सांगून, आपली तुलना अनेक आरोप असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या जगन रेड्डींशी करू नका, असा इशारा मोदींना दिला.भाजपा नेते काँग्रेसच्या संपर्कात?भाजपाच्या १५0 खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याच्या वृत्ताने त्या पक्षातही अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपाचे किमान ६0 खासदार काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून असल्याचे वृत्त आहे. खासदार शत्रुघ्न सिन्हा व कीर्ती आझाद त्यांचे नेतृत्व करीत असल्याची चर्चा आहे. या वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राजस्थानातील भाजपाचे २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांनी केला. - सविस्तर वृत्त/२

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस