शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नरेंद्र मोदींशी स्पर्धा नाहीच, 79 टक्के लोक म्हणतात 2019 च्या निवडणुकीत मोदींनाच मत देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 08:05 IST

नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयानंतरही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण नरेंद्र मोदींनाच मत देणार असल्याचं 79 टक्के लोकांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्दे2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण नरेंद्र मोदींनाच मत देणार असल्याचं 79 टक्के लोकांनी सांगितलं आहेफक्त 20 टक्के लोकांनी आपण नरेंद्र मोदींना स्पर्धा देण्यासाठी राहुल गांधींना मत देणार असल्याचं सांगितलं 58 टक्के लोकांनी आपण राहुल गांधींपासून अद्यापही प्रभावित झालो नसल्याचं म्हटलं आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही सर्वात आवडते नेते असून, सध्या तरी त्यांना कोणीच कडवी झुंज देत नसल्याचं समोर आलं आहे.  टाइम्सच्या ऑनलाइन सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयानंतरही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण नरेंद्र मोदींनाच मत देणार असल्याचं 79 टक्के लोकांनी सांगितलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच सध्या तरी सर्वात योग्य वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला आहे. 

सर्व्हेनुसार फक्त 20 टक्के लोकांनी आपण नरेंद्र मोदींना स्पर्धा देण्यासाठी राहुल गांधींना मत देणार असल्याचं सांगितलं आहे.  58 टक्के लोकांनी आपण राहुल गांधींपासून अद्यापही प्रभावित झालो नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे 34 टक्के लोकांनी राहुल गांधी मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत असून, त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

पण काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणजे 73 टक्के लोकांनी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बढती करण्यात आल्यानंतरही काँग्रेस हा पक्ष पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. पण मग याचा अर्थ राहुल गांधींना हटवलं तर काँग्रेसची प्रगती होईल असा आहे का ? तर याचं उत्तर नाही आहे. कारण सर्व्हेत सहभागी 38 टक्के लोकांनी गांधी परिवारातील कुटुंब काँग्रेसचा अध्यक्ष नसेल तर त्यांना मत देणार नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे 37 टक्के लोकांनी गांधी कुटुंबातील सदस्य अध्यक्ष नसेल तर काँग्रेसला मतदान करु असं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या स्पर्धेत अद्याप तरी राहुल गांधी खूप पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. महत्वाचं म्हणजे भाजपाला मिळणा-या समर्थनामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही तितकाच वाटा आहे. सोबतच भाजपानेही आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे. कारण 31 टक्के लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील तर आपण भाजपाला मतदान करणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. तर 48 टक्के लोकांनी नेता कोणीही असला तरी भाजपाला मतदान करु असं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली आहे एवढं मात्र नक्की. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा