शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जय शाह याच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, पुत्राच्या बचावासाठी सरसावले अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 13:16 IST

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता.

अहमदाबाद- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच जय शाह यांच्या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारावर पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीनं सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नव्हता. कोणतीही सरकारी जमीन जयनं घेतली नाही. हे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. काँग्रेसकडे जय शाह यानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे असल्यास न्यायालयात त्यांनी सादर करावे, असं आवाहनही अमित शाह यांनी काँग्रेसला दिलं आहे.स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. परंतु आतापर्यंत त्यांनी एकदाही मानहानीचा खटला दाखल केलेला नाही, याकडेही अमित शाहांनी लक्ष वेधलं. माझ्या मुलानं न्यायालयात जाऊन 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमच्यावर आरोप लावल्यानंतर आम्ही 100 कोटींचा मानहानीचा खटला भरला. काँग्रेसवर आतापर्यंत एवढे आरोप झाले, त्यांनी किती खटले भरले ?, असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात सादर करावे, असंही ते म्हणाले आहेत.उलाढाल आणि नफ्यात अंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाच पूर्ण विस्तारानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. जयच्या कंपनीचा वस्तूंची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. या कंपनीची उलाढाल 5 हजार रुपयांनी वाढून 80 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. परंतु उलाढाल आणि नफ्यात अंतर असतं, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कंपनी वस्तूंची निर्यात व आयात करण्याचं काम करते. त्यामुळेच त्या कंपनीची एवढी मोठी उलाढाल आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अनेक नेत्यांविरोधात न्यायालयात खटले सुरू आहेत. तरीही काँग्रेस या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी भाजपावर चुकीचे आरोप लावते आहे, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस