शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज भासू शकते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:10 IST

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असं राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं आहेत. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील सद्यस्थितीची माहिती मोदी आणि शहांना दिल्याचं त्रिपाठींनी 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असंदेखील ते पुढे म्हणाले. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच कार्यकर्ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आला. तर सहा कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. निवडणूक निकालानंतरही राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. निकालानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं त्रिपाठींनी सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या सूचना राज्य सरकारकडून फेटाळण्यात आल्या आहेत. याबद्दलच्या प्रश्नावरदेखील त्रिपाठींनी भाष्य केलं. केंद्र सरकारला सूचना देण्याचा अधिकार आहे आणि त्या सूचना स्वीकाराच्या की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असं राज्यपाल त्रिपाठी यांनी म्हटलं.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा