शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज भासू शकते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:10 IST

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असं राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं आहेत. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील सद्यस्थितीची माहिती मोदी आणि शहांना दिल्याचं त्रिपाठींनी 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असंदेखील ते पुढे म्हणाले. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच कार्यकर्ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आला. तर सहा कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. निवडणूक निकालानंतरही राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. निकालानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं त्रिपाठींनी सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या सूचना राज्य सरकारकडून फेटाळण्यात आल्या आहेत. याबद्दलच्या प्रश्नावरदेखील त्रिपाठींनी भाष्य केलं. केंद्र सरकारला सूचना देण्याचा अधिकार आहे आणि त्या सूचना स्वीकाराच्या की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असं राज्यपाल त्रिपाठी यांनी म्हटलं.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा