शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 19:10 IST

राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याचा योगींचा दावा

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात एकही दंगल न झाल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. योगींनी एकापाठोपाठ एक असे सात ट्विट करून आपल्या 21 महिन्यांच्या कारकिर्दीचं कौतुक करत स्वत:ची पाठ थोपटली आहे. राज्यातील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणल्याचा दावादेखील त्यांनी केला. माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल झाली नाही. गेल्या 2 वर्षात राज्यात कायद्याचं राज्य आलं, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केला. 'माझ्या कारकिर्दीत लोकांचा उत्तर प्रदेशबद्दलचा दृष्टीकोन बदलला. उत्तर प्रदेश म्हणजे भ्रष्टाचार, अराजकता आणि दंगली असा लोकांचा समज होता. फक्त देशातीलच नव्हे, तर परदेशातील लोकांचा उत्तर प्रदेशकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नव्हता. मात्र आता त्यात आमूलाग्र बदल झाला आहे,' असं योगींनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं. यानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीचं कौतुक केलं. मार्चमध्ये माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण होतील. या काळात एकदी दंगल झालेली नाही, असा दावा योगींनी केला. महिन्याभरापूर्वी गोहत्येच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात एका पोलीस अधिकाऱ्याची जमावानं हत्या केली होती. याशिवाय अनेक ठिकाणी तथाकथित गोरक्षकांनी धुमाकूळ घातला. यावरुन विरोधकांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा बसल्याचा दावा योगींनी केला. 'आम्ही संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवलं आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. कौटुंबिक वाद सोडले तर उत्तर प्रदेश पूर्णपणे सुरक्षित आहे,' असं योगींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश