शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

यशाचे मापदंड नसतात - मोदी

By admin | Updated: September 4, 2015 12:52 IST

यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशाचे गणित उलगडले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशाचे गणित उलगडले. पालकांनी त्यांची स्वप्नं मुलांवर लादू नये व मुलांच्या आवडीनिवडी जाणून घ्यावात असे आवाहनही मोदींनी केली आहे. 

शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी दिल्लीतील माणेकशाँ सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी ओळख असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आई-वडील व शिक्षकांचे मोलाचे योगदान असते, असे मोदींनी सांगितले. डॉक्टरने एका रुग्णाचे प्राण वाचवले तर त्याची बातमी येते, पण असे हजारो डॉक्टर, इंजिनिअर घडवणा-या शिक्षकांची कधीच बातमी येत नाही. पण आता शिक्षकांचे कौतुक करण्याची गरज आहे असे मोदींनी आवर्जून नमूद केले. आपल्याला फक्त रोबोट घडवायचे नाहीत, माणसांमध्ये संवेदवा असणे गरजेचे असते, या संवेदना कलेच्या माध्यमातून निर्माण होतात व म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत असे मोदींनी म्हटले आहे. भाषणानंतर मोदींनी विद्यार्थ्यांशी जवळपास दिड तास मनमोकळा संवाद साधला. राजकारणात येण्यासाठी काय करावे, देशसेवा कशी करता येईल, उत्तम वक्ता कसा होणार, कोणता खेळ खेळता अशी असंख्य प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारली. विशेष बाब म्हणजे मोदींनी या प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली. 

> विद्यार्थ्यांनी विचारलेली प्रश्न व त्यावर मोदींनी दिलेली उत्तर 

कोणता खेळ खेळायला आवडतो ?

मोदी - आम्ही राजकारणी काय खेळतो हे सर्वांनाच माहित आहे. मोदींच्या या उत्तरानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

> उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे ?

मोदी - उत्तम वक्ता होण्यासाठी तुम्ही उत्तम श्रोता होण्याची गरज आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमच्या आवडत्या क्षेत्राविषयीेचे वाचन करा. वाचनादरम्यान आवडलेल्या मुद्द्यांची नोट्स तयार केला. याचा वापर तुम्हाला भाषणात करता येईल. लोक काय बोलतील याचा विचार करण बंद करा. गुगल व यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जगभरातील उत्तम वक्त्यांची भाषण बघू शकता. यातूनही तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. 

> राजकारणात येण्यासाठी काय केले पाहिजे ? 

मोदी - आपल्या देशात राजकारणाविषयी गैरसमज आहेत. पण बुद्धिवान, हुशार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे. तरुण पिढीने राजकारणात तुम्हाला का यायचे आहे याचा विचार करावा. तुम्हाला जनतेची सेवा करायची आहे की फक्त निवडणूक जिंकायची आहे हे ठरवा.