शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे आहेत, पण जलद न्याय हवा ...तरच महिलांना समाजात वाटेल सुरक्षित", पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 08:04 IST

Narendra Modi News: महिलांच्या सुरक्षेसाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात आहेत. मात्र महिलांवरील अत्याचारप्रकरणी जलद न्याय मिळणे आवश्यक आहे. तरच महिलांना आपण समाजात सुरक्षित आहोत याची खात्री वाटेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली - महिलांच्या सुरक्षेसाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात आहेत. मात्र महिलांवरील अत्याचारप्रकरणी जलद न्याय मिळणे आवश्यक आहे. तरच महिलांना आपण समाजात सुरक्षित आहोत याची खात्री वाटेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या व बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे उद्‌गार काढले.

दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायव्यवस्था या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उ‌द्घाटन केले. याप्रसंगी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हेही उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले की, महिलांवर होणारे अत्याचार हा अतिशय गंभीर विषय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत. २०१९ साली जलदगती विशेष न्यायालय योजना सुरू करण्यात आली. जलद न्यायासाठी जिल्हा न्यायाधीश, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांचा समावेश असलेल्या जिल्हा देखरेख समित्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे मोदी म्हणाले.

आणीबाणी लागू करणे हे देशाच्या इतिहासातील काळे पर्व होते. त्यावेळी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे काम न्यायालयांनी केले. न्याययंत्रणा ही राज्यघटनेची संरक्षक मानली जाते. सर्वोच्च न्यायालय व न्याययंत्रणेने ती पार पाडली आहे, असेही मोदी म्हणाले.

 जलद न्यायासाठी एआय तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त : मोदीपंतप्रधान म्हणाले की, न्यायालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहे.आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशनसारख्या तंत्रज्ञानाचे साहाय्य या कामी घेण्यात आले. हे तंत्रज्ञान प्रलंबित खटल्यांचे विश्लेषण करण्यास मदत करेल.

'जिल्हा न्याययंत्रणा हा न्यायव्यवस्थेचा कणा'परिषदेच्या उद्घाटन समारंभात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, जिल्हा न्याययंत्रणा हा न्यायव्यवस्थेचा कणा आहे, कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यातील तो एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा न्यायव्यवस्थेला गौण  मानले जाते. ब्रिटिश राजवटीतील ही विचारसरणी आता बाजूला सारणे आवश्यक आहे. जिल्हान्यायव्यवस्थेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. 

प्रलंबित प्रकरणांनी ग्रासले न्याययंत्रणेला : न्या. खन्नासर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, प्रलंबित प्रकरणे व अनुशेष या समस्यांनी संपूर्ण न्याययंत्रणेला ग्रासले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा न्यायव्यवस्थेने अतिशय कार्यक्षमरीत्या केलेले काम महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या कामकाजाकडे पाहून सामान्य नागरिकांना न्याययंत्रणेविषयी एक प्रतिमा निर्माण होते. नागरिक पक्षकार किवा साक्षीदार म्हणून जिल्हा न्यायाधीशांच्या संपर्कात येत असतात, असेही न्या. खन्ना म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय