शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

..तर ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणार अटक, त्या अकाउंट्सवरून मोदी सरकार आक्रमक

By बाळकृष्ण परब | Updated: February 11, 2021 10:23 IST

Indian Government Vs Twitter : सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर आणि केंद्र सरकारमधील मतभेद विकोपाला गेले आहेत.

ठळक मुद्देप्रक्षोभक माहिती प्रसारित करणाऱ्या ट्विटर अकाऊंटविरोधील कारवाईबाबत केली जाणार नाही कुठल्याही प्रकारची तडजोड कंपनीला स्थानिक कायद्यांचे पालन करावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले होतेट्विटर या प्रकरणाला न्यायालयात नेण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून यासाठी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हवाला दिला जात आहे

नवी दिल्ली - सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर आणि केंद्र सरकारमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. केंद्र सरकारनेट्विटरवरील प्रक्षोभक माहिती प्रसारित करणारी अकाउंट्स सेंसर करण्याची मागणी केली होती. मात्र ट्विटरकडून त्याकडे काणाडोळा करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यावरून सरकारने आपली भूमिका कठोर केली असून, ट्विटरने आदेशांचे पालन न केल्यास ट्विटरच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली जाईल, असा इशारा दिला आहे. (Modi government is aggressive against those Twitter accounts)प्रक्षोभक माहिती प्रसारित करणाऱ्या ट्विटर अकाऊंटविरोधील कारवाईबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने सांगितले की, याबाबत संयमाचा अंत होत चालला आहे. भारताने बुधवारी ट्विटरला प्रक्षोभक माहिती हटवण्याच्या मुद्द्यावरून फटकारले होते. कंपनीला स्थानिक कायद्यांचे पालन करावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले होते. तसेच अनेक खासदारांनी स्वदेशी अ‍ॅप koo चा वापर करण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले होते.दरम्यान, मिळत असलेल्या माहितीनुसार ट्विटर या प्रकरणाला न्यायालयात नेण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून यासाठी अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हवाला दिला जात आहे. मात्र कंपनीने सरकारच्या आदेशावर अंशत: अंमलबजावणी करताना सरकारकडून सांगण्यात आलेल्या अकाऊंटपैकी अर्धी अकाउंट्स बंद केली आहेत.या मुद्द्यावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी ग्लोबल पॉलिसी ट्विटरचे उपाध्यक्ष मोनिक मेश आणि डेप्युटी जनरल कौन्सिल आणि उपाध्यक्ष (कायदे) जिम बेकर यांच्यासोबत व्हर्चुअल संवाद साधत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मंत्रालयाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामधून ट्विटर आदेशाचे पालन करण्यास दर्शवलेली अनिच्छा आणि अंमलबजावणीस केलेला उशीर याबाबत निराशा व्यक्त केली होती. तसेच भारतात घटना आणि कायदा सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया