शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:29 IST

Prashant Kishor retire from politics: जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत असून, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. 

Prashant Kishor Latest News: "आमच्याकडून नक्कीच काही चूक झाली आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले नाही. जर लोकांचा आमच्यावर विश्वास नसेल, तर पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी पराभवाची शंभर टक्के जबाबदारी घेतो." हे विधान आहे जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांचे. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आणि राजकारण सोडण्याबद्दलच्या विधानावरही खुलासा केला. 

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्यात चूक झाली, असेही म्हटले आहे. 

प्रामाणिक प्रयत्न केले, पण...

प्रशांत किशोर म्हणाले, "आमचे प्रयत्न प्रामाणिक होते. तरीही आम्हाला सपशेल अपयश आले आणि हे मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाहीये. व्यवस्थात्मक बदल सोडून द्या, पण आम्ही सत्तेतही बदल घडवू शकलो नाही. असे असले तरी बिहारचे राजकारण बदलण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभावली."

"आम्ही प्रयत्न केले,पण नक्कीच त्यात काही चुका झाल्या. आमच्या विचार करण्यातही चूक झाली. जनतेने आम्हाला निवडून दिले नाही. जर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, तर ती पूर्ण जबाबदारी माझी आहे. मी शंभर टक्के पराभवाची जबाबदारी स्वीकारतोय. मी बिहारच्या जनतेचा विश्वास संपादन करू शकलो नाही", असे प्रशांत किशोर यांनी पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले. 

प्रशांत किशोर म्हणाले, "तिथे मी अपयशी ठरलो"

"कोणत्या मुद्द्यावर मत दिले पाहिजे आणि नवी व्यवस्था का निर्माण केली पाहिजे, हे व्यवस्थितपणे बिहारच्या जनतेला सांगण्यात मी अपयशी ठरलो. प्रायश्चित म्हणून मी २० नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस गांधी आश्रमात मौन व्रत पाळणार आहे. आपण चुका करत असतो, पण आपण तो काही गुन्हा करत नाही", अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली. 

कोणत्याही जर-तर शिवाय राजकारणातून संन्यास घेईन

नितीश कुमार यांच्या पक्षाला २५ जागा मिळतील असे विधान प्रशांत किशोर यांनी केले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "जेडीयूला २५ जागा मिळतील या माझ्या विधानाची लोक चर्चा करत आहेत. त्या विधानावर मी अजूनही ठाम आहे. जर नितीश कुमार यांनी प्रत्येक महिलेच्या खात्यात १० हजार रुपये टाकले नसते, तर त्यांना २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या नसत्या."

"नितीश कुमारांनी २ लाख रुपये खात्यात जमा केले नसते. दीड कोटी महिलांना वचन दिले. जर त्यांनी हे सिद्ध केले की, मते विकत घेऊन जिंकले नाहीत, तर मी कोणताही प्रश्न उपस्थित न करता राजकारणातून निवृत्त होईन", असे प्रशांत किशोर म्हणाले. 

प्रशांत किशोर यांचा पुढचा प्लॅन काय?

"मी पुन्हा कठोर मेहनत घेणार आहे. जसे तुम्ही मला गेल्या तीन वर्षात मेहनत करताना बघितले. मी सगळी शक्ती ओतली होती. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाहीये, जोपर्यंत माझा चांगला बिहारचा संकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही", असे सांगत प्रशांत किशोर यांनी पुढचा कार्यक्रमही जाहीर केला.   

English
हिंदी सारांश
Web Title : Prashant Kishor accepts defeat, vows to quit politics if proven wrong.

Web Summary : Prashant Kishor accepts responsibility for the Bihar election defeat, citing messaging failures. He denies vote-buying allegations against Nitish Kumar, promising to retire from politics if proven otherwise. Kishor vows to continue working for a better Bihar.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा