शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Prashant Kishor : "...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:52 IST

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. २०२५ ची विधानसभा निवडणूक ते मोठ्या उत्साहाने लढवणार आहेत पण त्याआधी त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, जर जन सुराजला १३० किंवा १४० जागा मिळाल्या तर ते त्याला आपला पराभव मानतील.

जन सुराजच्या एका अकाऊंटवरून मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. प्रश्नांचं उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, "मी सांगतोय की, मला १३०-१४० जागा मिळाल्या तर मी तो मोठा पराभव मानेन. मी माझ्या आयुष्यातील हा मोठा पराभव मानेन की तीन वर्ष, माझ्या आयुष्यातील सर्व काही, मी माझा अनुभव, माझे प्रयत्न, माझं जीवन पणाला लावलं आहे आणि जर मला १३० जागा मिळाल्या तर मी तो जन सुराजचा पराभव समजेन."

लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोघांनी बिहारचं नुकसान केलं आहे. भाजपा आणि काँग्रेसने या दोघांपेक्षा जास्त बर्बाद केलं आहे. कारण लालू प्रसाद यादव हे स्वबळावर एकदाच बिहार जिंकले हे लोकांना माहीत नाही. नितीश कुमार यांनी आजपर्यंत स्वबळावर बिहार जिंकलेला नाही. या दोन्ही गोष्टी जनतेवर लादण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. काही खासदारांच्या लालसेपोटी काँग्रेसने लालूंना बिहार विकला."

"आज भाजपाही तेच करत आहे. बिहारची जनता नितीश यांच्या हाती गेली आहे" असंही प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. प्रशांत किशोर गेल्या दोन वर्षांपासून पदयात्रा करत आहेत. जन सुराज पक्षाची २ ऑक्टोबरला स्थापना होणार असून हा पक्ष बिहारमध्ये २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिहारमधील लोकांना बदल हवा आहे आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असा दावा प्रशांत किशोर सातत्याने करत आहेत.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव