शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Kishor : "...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:52 IST

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. २०२५ ची विधानसभा निवडणूक ते मोठ्या उत्साहाने लढवणार आहेत पण त्याआधी त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, जर जन सुराजला १३० किंवा १४० जागा मिळाल्या तर ते त्याला आपला पराभव मानतील.

जन सुराजच्या एका अकाऊंटवरून मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. प्रश्नांचं उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, "मी सांगतोय की, मला १३०-१४० जागा मिळाल्या तर मी तो मोठा पराभव मानेन. मी माझ्या आयुष्यातील हा मोठा पराभव मानेन की तीन वर्ष, माझ्या आयुष्यातील सर्व काही, मी माझा अनुभव, माझे प्रयत्न, माझं जीवन पणाला लावलं आहे आणि जर मला १३० जागा मिळाल्या तर मी तो जन सुराजचा पराभव समजेन."

लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोघांनी बिहारचं नुकसान केलं आहे. भाजपा आणि काँग्रेसने या दोघांपेक्षा जास्त बर्बाद केलं आहे. कारण लालू प्रसाद यादव हे स्वबळावर एकदाच बिहार जिंकले हे लोकांना माहीत नाही. नितीश कुमार यांनी आजपर्यंत स्वबळावर बिहार जिंकलेला नाही. या दोन्ही गोष्टी जनतेवर लादण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. काही खासदारांच्या लालसेपोटी काँग्रेसने लालूंना बिहार विकला."

"आज भाजपाही तेच करत आहे. बिहारची जनता नितीश यांच्या हाती गेली आहे" असंही प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. प्रशांत किशोर गेल्या दोन वर्षांपासून पदयात्रा करत आहेत. जन सुराज पक्षाची २ ऑक्टोबरला स्थापना होणार असून हा पक्ष बिहारमध्ये २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिहारमधील लोकांना बदल हवा आहे आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असा दावा प्रशांत किशोर सातत्याने करत आहेत.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव