शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

....तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला 2600 रुपये वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 18:20 IST

अन्नधान्य आणि उर्जेवर देण्यात येणारी सर्वप्रकारची अनुदाने बंद केल्यास देशातील प्रत्येक व्यक्तीला 2600 रुपये युनिव्हर्सल बेसिक इन्कमपोटी (यूबीआय) देणे शक्य

नवी दिल्ली - अन्नधान्य आणि उर्जेवर देण्यात येणारी सर्वप्रकारची अनुदाने बंद केल्यास देशातील प्रत्येक व्यक्तीला वार्षिक 2600 रुपये युनिव्हर्सल बेसिक इन्कमपोटी (यूबीआय) देणे शक्य होईल, असे निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या बाबतीत नोंदवले आहे. मध्यंतरी यूबीआयच्या मुद्द्यावरून देशात चर्चांना ऊत आला होता. शिवाय जगभरातील अनेक देशांनी याविषयी निरीक्षणेही नोंदवली आहेत.

नाणेनिधीने म्हटले की, यूबीआय योजनेवर सध्या अनेक देश विचार करीत आहेत. या योजनेत गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सरकार सर्वांना ठरावीक रक्कम देणार आहे. या योजनेत सबसिडी पूर्णत: संपेल. त्याऐवजी सर्वच लोकांना ठरावीक रक्कम सरकारकडून दरमहा मिळेल. ही संकल्पना नवी नाही. या संकल्पनेवर अर्थशास्त्रज्ञ अनेक दशकांपासून विचार करीत आहेत. ही योजना भारताने राबविल्यास काय परिणाम होतील, याचा अभ्यास नाणेनिधीने केला आहे. 2011 मध्ये भारत सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या सबसिड्यांच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास करण्यात आला. इंधन सबसिडीचा त्यात समावेश आहे

सध्या देण्यात येणाऱ्या अनुदान व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी असल्याने त्यांचा लाभ अल्प उत्पन्न अथवा कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील जनतेला घेता येत नसल्याचेही आयएमएफचे म्हणणे आहे. देशात वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्य आणि इंधनावरील अनुदान बंद करण्यासाठी 2600 रुपयांचा यूबीआयचा आकडा निर्धारित करण्यात आला आहे. त्यासाठी आयएमएफने 2016च्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. त्यानुसार त्यातून यूबीआयसाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा करता येणार आहे. 

...तर गरिबांनाच फायदानाणेनिधीच्या वित्तीय व्यवहार विभागाचे संचालक व्हिटोर गास्पर यांनी सांगितले की, भारत सरकारने २0११मध्ये जेवढी सबसिडी दिली होती. तेवढीच रक्कम यूबीआय कार्यक्रमांतर्गत वितरित केल्यास गरिबांना अधिक फायदा होईल, असे अभ्यासातून दिसून आले आहे. ज्या देशांत ठरावीक वर्गाला मोठ्या प्रमाणात सबसिडीच्या स्वरूपात लाभ दिला जातो, त्या देशांसाठी यूबीआय योजना हा चांगला पर्याय होऊ शकतो, असे आम्हाला वाटते.

दिशा बदलणार?ज्या देशांत असमान आणि अपुरा सार्वजनिक खर्च होतो, त्या देशांतच यूबीआय ही योजना चांगला पर्याय होऊ शकते. हा अभ्यास आम्ही २0११च्या आकडेवारीनुसार केला आहे. त्यानंतरच्या काळात भारतातील स्थिती बरीच बदलली आहे. विशेषत: २0११नंतर इंधनाच्या सबसिडीत खूपच सुधारणा झाली आहे. भारत आर्थिक विकास आणि बदलांच्या प्रक्रियेत आहे. अशा परिस्थितीत भारत यूबीआयवर विचार करील की, संपूर्ण वेगळी दिशा स्वीकारील, हे सांगणे अवघड आहे. राजकीय नेतृत्व आणि धोरण निर्माते स्थितीचे आकलन कसे करतात यावरच हे ठरेल, असे गास्पर म्हणाले.

सुब्रह्मण्यम यांनी दिला पाठिंबायुनिव्हर्सल बेसिक इन्कम अर्थात ‘यूबीआय’वरून देशात मोठी चर्चा झाली आहे. अनेक कॉर्पोरेट्सच्या मते यूबीआयमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यूबीआयला जाहीर पाठिंबा दिला आहे. सुब्रह्मण्यम यांच्या मते सध्या लागू असणाऱ्या 950 योजनांवर एकूण जीडीपीच्या 5 टक्के रक्कम खर्च होते. त्यातील सर्वांत मोठ्या अकरा योजनांवर एकूण तरतुदीच्या 50 टक्के रक्कम खर्च होते.

टॅग्स :Indiaभारत