शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

... मग न्यायालयेच बंद करा; एन्काऊंटरवर औवेसींचा संताप, सांगितला धार्मिक भेदभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 17:35 IST

युपीमधील एन्काऊंटरच्या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे

हैदराबाद - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद व त्याचा साथीदार गुलाम या दोघांचा एन्काऊंटर करत त्यांना ठार केलं. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या दोघांचा खात्मा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. या घटनेवरुन मत-मतांतर व्यक्त होत आहेत. अनेकांनी या एन्काऊंटरचं समर्थन केलंय. मात्र, युपीतील विरोधी पक्ष असलेल्या सपाने आणि एमआयएमने या एन्काऊंटरचा विरोध केला आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्थाच नसल्याचेही म्हटले आहे. 

युपीमधील एन्काऊंटरच्या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे. तर, सोशल मीडियावरही योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, त्यांनी मिट्टी मे मिला देंगे असे म्हणत इशारा दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, या घटनेवरुन एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. 

तुम्ही एन्काऊंटर करताना धार्मिक भेद करता, धर्माच्या नावाने तुम्ही एन्काऊंटर करता. जुनैद आणि नसीरला ज्यांनी मारलं, तुम्ही भाजपवाले त्यांचाही एन्काऊंटर करणार का? नाही करणार. कारण, तुम्ही धर्माच्या नावाने एन्काऊंटर करता. जुनैद आणि नसीरच्या हत्येतील केवळ १ आरोपी पकडला, इतर ९ जण गायब आहेत, असे म्हणत एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

तसेच, युपीतील हा एन्काऊंटर नसून इथे कायदा व सुव्यवस्थेची चिरफाड होतेय. तुम्ही संविधानाचा एन्काऊंटर करू इच्छितात, देशात न्यायालये कशासाठी आहेत, सीआरसीपी, आयपीसी कशासाठी आहेत. जर तुम्हीच निर्णय घेणार असाल, बंदुकीच्या गोळीने न्याय करणार असाल, तर मग न्यायालयेच बंद करा, अशा शब्दात खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी राज्यातील एन्काऊंटरच्या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला.

अखिलेश यादव यांच्याकडून चौकशीची मागणी

खोटे एन्काऊंटर करुन भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांपासून दूर पळत आहे. भाजपावाले न्यायालयावर विश्वासच करत नाहीत. आजच्या या एन्काऊंटरचा कसून तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली. तसेच,  भाजपा बंधुप्रेम जपण्याविरुद्ध आहे, चूक-बरोबर याचा निर्णय घेण्याचा अधिकार सत्तेचा नाही, असे म्हणत या एन्काऊंटवरच्या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे. 

दोघेही जागीच ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्या दोघांवर गोळीबार केला, यात दोघेही जागीच ठार झाले. युपी पोलिसांच्या या कारवाईमुळे योगी आदित्यनाथ याचं सरकार पुन्हा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी, मिट्टी मे मिला देंगें असे म्हणत युपीतील गुंडगिरीला इशाराच दिला होता. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश