शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अपघातातील जखमी युवक तडफडत राहिला; शेवटी मृत्यू झाला तरीही लोक Video काढत राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:32 IST

व्हिडिओ, फोटो काढणाऱ्यांपैकी कुणीही पीयूषला हॉस्पिटलला पोहचवले नाही.

नवी दिल्ली – सध्याच्या सोशल मीडिया जगतात व्हायरल होण्याची क्रेझ इतकी डोक्यात गेलीय की समाजात माणुसकी हरवत चाललीय हे खेदाने म्हणावे लागेल. कुठल्याही अपघाताची घटना असेल तर आधी व्हिडिओ काढू आणि सोशल मीडियावर लाईक्स, फॉलोअर्स वाढवण्याचा विचार माणसाच्या मनात येतो हे दिल्लीतील एका घटनेवरून दिसून आले. एका युवा चित्रपट निर्माता पीयूष पालसोबत हेच घडले. एका बाईकला धडकल्याने पीयूष यांचा रस्त्यात अपघात झाला. जवळपास अर्धा तास ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते परंतु मदत करण्यासाठी कुणाचाही हात पुढे आला नाही.

पीयूष पालच्या शरीरातून रक्त जात होते. त्यांना तात्काळ उपचारांची गरज होती. मात्र हद्द म्हणजे याठिकाणी उपस्थित लोकं उभं राहून पीयूष पाल तडफडत असताना व्हिडिओ काढण्यास गुंग राहिले. व्हिडिओ, फोटो काढणाऱ्यांपैकी कुणीही पीयूषला हॉस्पिटलला पोहचवले नाही. दुर्दैवाने उपचार न मिळाल्याने पीयूष पालचा मृत्यू झाला. पीयूष पालसोबत घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

मागील गुरुवारी दिल्लीच्या रिंग रोडवर रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी पीयूष पालचा रस्ते अपघात झाला. रस्त्यावर जखमी अवस्थेत पीयूष अर्धा तास विव्हळत राहिला. परंतु त्याला कुणीही हॉस्पिटलला पोहचवलं नाही. जखमी अवस्थेत रक्त जास्त सांडल्याने पीयूषचा जीव गेला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घटनास्थळी पीयूष पालला कुणी मदत केली नाही पण चोरांनी पीयूषचा फोन आणि लॅपटॉप चोरी करून पसार झाले.

अलीकडेच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने देशातील अपघातांची आकडेवारी जारी केलीय. २०२२ मध्ये देशात १ लाख ६८ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशात ७१ टक्के अपघात वेगवान वाहनांमुळे झाले आहेत. अतिवेगामुळे १ लाख २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. नशेत ड्रायव्हिंग करण्यामुळे ४ हजार २०० लोकांना जीव गमवावा लागला आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे ३४०० लोकं दगावली आहेत. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचा झाला आहे. अपघातातील मृतांपैकी ५० टक्के लोकांनी हेल्मेट घातले नव्हते. रस्ते अपघातात देशात राजधानी दिल्ली असुरक्षित मानली जाते. इथं २०२२ मध्ये १ हजार ४६१ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातSocial Mediaसोशल मीडिया