शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमी युवक तडफडत राहिला; शेवटी मृत्यू झाला तरीही लोक Video काढत राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:32 IST

व्हिडिओ, फोटो काढणाऱ्यांपैकी कुणीही पीयूषला हॉस्पिटलला पोहचवले नाही.

नवी दिल्ली – सध्याच्या सोशल मीडिया जगतात व्हायरल होण्याची क्रेझ इतकी डोक्यात गेलीय की समाजात माणुसकी हरवत चाललीय हे खेदाने म्हणावे लागेल. कुठल्याही अपघाताची घटना असेल तर आधी व्हिडिओ काढू आणि सोशल मीडियावर लाईक्स, फॉलोअर्स वाढवण्याचा विचार माणसाच्या मनात येतो हे दिल्लीतील एका घटनेवरून दिसून आले. एका युवा चित्रपट निर्माता पीयूष पालसोबत हेच घडले. एका बाईकला धडकल्याने पीयूष यांचा रस्त्यात अपघात झाला. जवळपास अर्धा तास ते रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते परंतु मदत करण्यासाठी कुणाचाही हात पुढे आला नाही.

पीयूष पालच्या शरीरातून रक्त जात होते. त्यांना तात्काळ उपचारांची गरज होती. मात्र हद्द म्हणजे याठिकाणी उपस्थित लोकं उभं राहून पीयूष पाल तडफडत असताना व्हिडिओ काढण्यास गुंग राहिले. व्हिडिओ, फोटो काढणाऱ्यांपैकी कुणीही पीयूषला हॉस्पिटलला पोहचवले नाही. दुर्दैवाने उपचार न मिळाल्याने पीयूष पालचा मृत्यू झाला. पीयूष पालसोबत घडलेला प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

मागील गुरुवारी दिल्लीच्या रिंग रोडवर रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी पीयूष पालचा रस्ते अपघात झाला. रस्त्यावर जखमी अवस्थेत पीयूष अर्धा तास विव्हळत राहिला. परंतु त्याला कुणीही हॉस्पिटलला पोहचवलं नाही. जखमी अवस्थेत रक्त जास्त सांडल्याने पीयूषचा जीव गेला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घटनास्थळी पीयूष पालला कुणी मदत केली नाही पण चोरांनी पीयूषचा फोन आणि लॅपटॉप चोरी करून पसार झाले.

अलीकडेच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने देशातील अपघातांची आकडेवारी जारी केलीय. २०२२ मध्ये देशात १ लाख ६८ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशात ७१ टक्के अपघात वेगवान वाहनांमुळे झाले आहेत. अतिवेगामुळे १ लाख २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. नशेत ड्रायव्हिंग करण्यामुळे ४ हजार २०० लोकांना जीव गमवावा लागला आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे ३४०० लोकं दगावली आहेत. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचा झाला आहे. अपघातातील मृतांपैकी ५० टक्के लोकांनी हेल्मेट घातले नव्हते. रस्ते अपघातात देशात राजधानी दिल्ली असुरक्षित मानली जाते. इथं २०२२ मध्ये १ हजार ४६१ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातSocial Mediaसोशल मीडिया