शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

'यूपीए सरकार आल्यानंतर लगेच महिला आरक्षण विधेयक लागू करणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 13:14 IST

महिला आरक्षण लगेच लागू झाले पाहिजे, केंद्र सरकार जनगणनेसारखी कारण सांगत, असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

काही महिन्यातच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. तसेच देशातील ५ विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या संदर्भात राहुल गांधींनी मोठा दावा केला आहे. एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तेलंगणा जिंकू शकतो, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. राजस्थानमध्येही अत्यंत निकराची लढत होणार आहे, असा दावा गांधींनी केला.

एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त

राहुल गांधी म्हणाले की, तेलंगणात भाजप कुठेही स्पर्धेत नाही. जर आपण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही तसेच काहीसे आहे. राजस्थानमध्ये सध्या आमचे सरकार आहे आणि सरकारविरोधात कोणताही राग नसल्याचे येथील लोक सांगत आहेत. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रेबाबत भाजपवर निशाणा साधला. गांधी म्हणाले, भाजप आणि मीडिया विरोधकांचा संदेश जनतेपर्यंत नीट पोहोचू देत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत जोडो यात्रेची मदत घेतली. त्यातही सरकारने अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांना थेट भेटणे चांगले, असंही राहुल गांधी म्हणाले. 

"नारी शक्ती वंदन कायदा झाला असताना महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. ही आरक्षण पद्धत तातडीने लागू करण्याची काँग्रेसची मागणी आहे, मात्र केंद्र सरकार जनगणना आणि सीमांकनाची सबब पुढे करत व्यस्त आहे. यूपीए सत्तेत आल्यास आमचे सरकार महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करेल, असंही राहुल गांधी म्हणाले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी आणि मोदी सरकारमधील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी म्हणाले की, सर्व मोठे उद्योग अदानी यांना देण्यात आले आहेत. देशातील जनता महागाईने हैराण झाली आहे, मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही. बिधूडी यांचे विधान असो किंवा इंडिया विरुद्ध भारत असा मुद्दा असो, हे सर्व मुद्दे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा