शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

'यूपीए सरकार आल्यानंतर लगेच महिला आरक्षण विधेयक लागू करणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 13:14 IST

महिला आरक्षण लगेच लागू झाले पाहिजे, केंद्र सरकार जनगणनेसारखी कारण सांगत, असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

काही महिन्यातच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. तसेच देशातील ५ विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या संदर्भात राहुल गांधींनी मोठा दावा केला आहे. एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तेलंगणा जिंकू शकतो, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. राजस्थानमध्येही अत्यंत निकराची लढत होणार आहे, असा दावा गांधींनी केला.

एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त

राहुल गांधी म्हणाले की, तेलंगणात भाजप कुठेही स्पर्धेत नाही. जर आपण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही तसेच काहीसे आहे. राजस्थानमध्ये सध्या आमचे सरकार आहे आणि सरकारविरोधात कोणताही राग नसल्याचे येथील लोक सांगत आहेत. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रेबाबत भाजपवर निशाणा साधला. गांधी म्हणाले, भाजप आणि मीडिया विरोधकांचा संदेश जनतेपर्यंत नीट पोहोचू देत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत जोडो यात्रेची मदत घेतली. त्यातही सरकारने अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांना थेट भेटणे चांगले, असंही राहुल गांधी म्हणाले. 

"नारी शक्ती वंदन कायदा झाला असताना महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. ही आरक्षण पद्धत तातडीने लागू करण्याची काँग्रेसची मागणी आहे, मात्र केंद्र सरकार जनगणना आणि सीमांकनाची सबब पुढे करत व्यस्त आहे. यूपीए सत्तेत आल्यास आमचे सरकार महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करेल, असंही राहुल गांधी म्हणाले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी आणि मोदी सरकारमधील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी म्हणाले की, सर्व मोठे उद्योग अदानी यांना देण्यात आले आहेत. देशातील जनता महागाईने हैराण झाली आहे, मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही. बिधूडी यांचे विधान असो किंवा इंडिया विरुद्ध भारत असा मुद्दा असो, हे सर्व मुद्दे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा