शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जग हिंदुत्वाकडं बघतय, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावं लागेल; थायलंडमधून मोहन भागवतांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 4:41 PM

भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे.

भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या प्रयोगांनंतर डगमगणाऱ्या जगाला आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग भारत दाखवेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी थायलंडच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी जगभरातील हिंदूंना एकमेकांशी जोडले जाण्यासंदर्भात आवाहनही केले.

यावेळी भागवत, 'जगभरातील विचारवंत, कार्यकर्ते, नेते आणि उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले, 'आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावे लागेल, त्यांच्यासोबत संपर्क साधावा लागेल. सर्व हिंदू एकत्र येऊन जगभरातील हिंदूंसोबत संपर्क साधतील. हिंदू अधिकाधिक संख्येने एकमेकांसोबत जोडले जात आहेत आणि जगाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.'

भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे. ते म्हणाले, सध्या संपूर्ण जग भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोगा करताना डगमगत आहे आणि आनंदाच्या शोधात हिंदुत्वाकडे बघत आहे.

सरसंघचालक म्हणाले, 'आजचे जग डगमगत आहे, चाचपडत आहे. गेली 2,000 वर्षे त्यांनी आनंद आणि शांतेसाठी भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोग केले. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली. मात्र, समाधान मिळाले नाही. आता कोरोना महामारीनंतर, त्यांनी यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. आता, भारतच मार्ग दाकवेल, यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे.

'आपल्याला सर्वांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना आपल्या सेवांच्या माध्यमाने आमच्याकडे आणावे लागेल. आपल्याकडे उत्साह आहे. निःस्वार्थ सेवेसाठी आपण जगात अग्रेसर आहोत. हे आपल्या परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची मने जिंका,' असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्व