शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील १९९२-९३च्या दंगलीत कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन सरकार अपयशी- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 06:36 IST

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जनतेच्या हक्कांची जपणूक करण्याची हमी राज्यघटनेच्या २१ व्या कलमात देण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली : बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर १९९२-९३ साली मुंबईत जातीय दंगल उसळली होती. ही दंगल रोखण्यात आलेले अपयश व त्यावेळी ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनेनंतर सुमारे तीस वर्षांनी महाराष्ट्रातील तत्कालीन राज्य सरकारला दोषी ठरवले आहे. तसेच या दंगलीची झळ पोहोचलेल्या कुटुंबांना भरपाई द्यावी तसेच त्यावेळच्या बासनात पडून असलेल्या गुन्हे प्रकऱणांचा पुन्हा तपास करावा, असा महत्त्वपूर्ण आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जनतेच्या हक्कांची जपणूक करण्याची हमी राज्यघटनेच्या २१ व्या कलमात देण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. मात्र, त्या गोष्टीत महाराष्ट्रातल्या तत्कालीन राज्य सरकारला अपयश आले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. दंगलीत मरण पावलेल्या ९०० जणांच्या तसेच ६० बेपत्ता लोकांच्या वारसदारांना २ लाख रुपये भरपाई देण्यात आली. उर्वरित १०० बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना शोधून त्यांनाही भरपाई द्या, असे काेर्ट म्हणाले.

पीडितांना भरपाई द्या-

मुंबईतील १९९२-९३च्या जातीय दंगलीत मरण पावलेल्या ९०० जणांच्या तसेच ६० बेपत्ता लोकांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्यात आली. या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली. या दंगलीत १६० जण बेपत्ता झाले होते. पण प्रत्यक्षात ६० जणांच्या वारसदारांना भरपाई देणे शक्य झाले, असेही राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यावर उर्वरित १०० बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना शोधून त्यांनाही भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

देखरेखीसाठी समिती

न्यायालयाच्या आदेशाचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र