शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

मुंबईतील १९९२-९३च्या दंगलीत कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन सरकार अपयशी- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 06:36 IST

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जनतेच्या हक्कांची जपणूक करण्याची हमी राज्यघटनेच्या २१ व्या कलमात देण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली : बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर १९९२-९३ साली मुंबईत जातीय दंगल उसळली होती. ही दंगल रोखण्यात आलेले अपयश व त्यावेळी ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनेनंतर सुमारे तीस वर्षांनी महाराष्ट्रातील तत्कालीन राज्य सरकारला दोषी ठरवले आहे. तसेच या दंगलीची झळ पोहोचलेल्या कुटुंबांना भरपाई द्यावी तसेच त्यावेळच्या बासनात पडून असलेल्या गुन्हे प्रकऱणांचा पुन्हा तपास करावा, असा महत्त्वपूर्ण आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जनतेच्या हक्कांची जपणूक करण्याची हमी राज्यघटनेच्या २१ व्या कलमात देण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. मात्र, त्या गोष्टीत महाराष्ट्रातल्या तत्कालीन राज्य सरकारला अपयश आले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. दंगलीत मरण पावलेल्या ९०० जणांच्या तसेच ६० बेपत्ता लोकांच्या वारसदारांना २ लाख रुपये भरपाई देण्यात आली. उर्वरित १०० बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना शोधून त्यांनाही भरपाई द्या, असे काेर्ट म्हणाले.

पीडितांना भरपाई द्या-

मुंबईतील १९९२-९३च्या जातीय दंगलीत मरण पावलेल्या ९०० जणांच्या तसेच ६० बेपत्ता लोकांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्यात आली. या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली. या दंगलीत १६० जण बेपत्ता झाले होते. पण प्रत्यक्षात ६० जणांच्या वारसदारांना भरपाई देणे शक्य झाले, असेही राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यावर उर्वरित १०० बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना शोधून त्यांनाही भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

देखरेखीसाठी समिती

न्यायालयाच्या आदेशाचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र