शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्व्हेतून राजस्थानात भाजप विजयाची भविष्यवाणी, पण दोन कारणांनी टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:55 IST

सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात.

राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र यातच, एका ताज्या सर्व्हेने भाजपला राजस्थानात सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात प्रचाराची सुरुवात करणाऱ्या भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात.

सर्व्हेचा दावा -एबीपी न्यूजने सी व्होटरसह गुरुवारी जारी केलेल्या ओपिनियन पोलमध्ये यावेळी राजस्थानात भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. सर्व्हेतील आकडेवारीनुसार, 200 जागांच्या या विधानसभेत भाजपला 109-119 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 78-88 जागा मिलण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 1-5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला 46 टक्के मतं मिलू शकतात. तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांच्या खात्यात 13 टक्के मतं जाण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी गेहलोत पहिल्या पसंतीचे उमेदवार - या सर्व्हेमध्ये एका बाजूला भाजपच्या विजयाची भविष्यवाणी केली गेली असली तरी, दुसऱ्या बाजूला मात्र अशोक गेहलोतांची जादूही दिसत आहे. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते. सर्व्हेमध्ये लोकांना प्रश्न करण्यात आला की, मुख्यमंत्री पदासाठी आपली पहिली पसंती कुणाला? यावर 35 टक्के लोकांनी गेहलोतांना पसंती दर्शवली. तर २५ टक्के लोकांना वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. तसेच, सचिन पायलट यांना १९ टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे. 

याचबरोबर, ९ टक्के लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय गजेंद्र सिंह शेखावत यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असल्याचे सांगितले. याशिवाय सात टक्के लोकांना भाजप प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठोड यांना मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे.

41 टक्के लोक गेहलोतांच्या कामावर समाधानी -सर्व्हेतील भाजपचे टेन्शन वाढवू शकते अशी आणकी एक गोष्ट म्हणजे, राजस्थानातील बहुतांश लोकांनी गेहलोतांच्या कामावर समाधानी असल्याचे म्हटले आहे. तब्बल 41 टक्के लोकांनी गेहलोतांच्या कामावर अत्यंत समाधानी असल्याचे म्हटले आहे. याच वेळी, 35 टक्के लोकांनी कमी समाधानी असल्याचे म्हटले आहे, 21 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. तर 3 टक्के लोकांनी 'माहित नाही' असे म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान