शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

‘भरपूर मुलं जन्माला घाला, घर मोदी देतील’, दोन पत्नी, आठ मुले असलेल्या मंत्र्याचं विधान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:50 IST

Rajasthan News: राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थानमध्येभाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे. आचार्य बालमुकुंद यांच्या विधानानंतर आता मंत्री बाबूलाल खराडी यांचं एक विधान चर्चेत आहेत. खराडी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बोलताना  लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी हे विधान गमतीचा भाग म्हणून केलं होतं. हेच विधान आता चर्चेत आहे.

आदिवासी विकास मंत्री खराडी यांनी जिल्ह्यातील नाई गावामध्ये विकसित भारत संपर्क यात्रेंतर्गत आयोजित एका कार्यक्रमामध्ये हे विधान केलं. ते म्हणाले की, तुम्ही भरपूर मुलांना जन्माला घाला. अडचण कुठली आहे? कुणी उपाशी आणि बेघर राहणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे स्वत: खराडी यांच्या दोन पत्नी आणि आठ मुले आहेत. त्यात चार मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे. या भागात बहुविवाह प्रथा अजूनही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला घर बांधून देतील, असं विधान त्यांनी करताच उपस्थितांनी खो खो हसायला सुरुवात केली. खराडी यांनी हे विधान केलं तेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेही मंचावर उपस्थित होते. झाडोल विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले आणि पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या बाबूलाल खराडी यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा