शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 21:14 IST

Karnataka: मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे.

मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे. आता भाजपाच्या एका बड्या नेत्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सिद्धारमैय्या सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे २५ आमदार पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असा दावा भाजपा नेते बसनगौडा पाटील यांनी केला आहे. 

विजापूर मतदारसंघातील आमदार असलेल्या बसनगौडा पाटील यांनी सांगितले की, राज्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येईल. काँग्रेस म्हणते की त्यांनी १३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र ते झोपू शकत नाही आहेत. जर ३० जणांनी पक्ष सोडला तर सरकार कोसळेल. २५ आमदार काँग्रेस सोडण्यास तयार आहेत. काही मंत्री त्यांच्याकडे सर्व शक्ती केंद्रित झाल्यासारखे वागत आहेत. तसेच ते अधिकाऱ्यांना हटवत आहेत किंवा त्यांच्या बदल्या करत आहेत.

विजापूरमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आल्याचा आरोप करत बसनगौडा पाटील म्हणाले की, तुम्ही मुस्लिमांना आणून काय करू शकता? मी आमदार आहे आणि त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. जर कुणी अधिकारी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी नाटक करत असेल, तर आम्ही जानेवारीत परत सत्तेत येऊ. काँग्रेस लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधून बाहेर जाईल, असा दावाही त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, त्यामुळेच विजापूरमधील दोन मंत्री जे सत्ता आल्यानंतर हवेत उंच उड्डाणे घेतोय, असे वागत होते. त्यांचा आवाज आता काहीसा सौम्य झाला आहे. ३५ ते ४० आमदार पक्ष सोडण्यात तयार आहेत. हे त्यांना कळून चुकलंय. जर ३०-३५ जण तयर झाले तर हे सरकार पडेल.

बसवराज रायरेड्डी यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांकडून हल्लीच आमदारांच्या बैठकीमध्ये कर्नाटक हे भ्रष्ट राज्य बनल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी सांगितले की, त्यांचे स्वत:चे आमदार सांगत आहेत की, त्यांना पैसा हवाय, कारण त्यांनी निवडणुकीमध्ये खर्च केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्याBJPभाजपा