शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 21:14 IST

Karnataka: मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे.

मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे. आता भाजपाच्या एका बड्या नेत्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सिद्धारमैय्या सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे २५ आमदार पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असा दावा भाजपा नेते बसनगौडा पाटील यांनी केला आहे. 

विजापूर मतदारसंघातील आमदार असलेल्या बसनगौडा पाटील यांनी सांगितले की, राज्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येईल. काँग्रेस म्हणते की त्यांनी १३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र ते झोपू शकत नाही आहेत. जर ३० जणांनी पक्ष सोडला तर सरकार कोसळेल. २५ आमदार काँग्रेस सोडण्यास तयार आहेत. काही मंत्री त्यांच्याकडे सर्व शक्ती केंद्रित झाल्यासारखे वागत आहेत. तसेच ते अधिकाऱ्यांना हटवत आहेत किंवा त्यांच्या बदल्या करत आहेत.

विजापूरमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आल्याचा आरोप करत बसनगौडा पाटील म्हणाले की, तुम्ही मुस्लिमांना आणून काय करू शकता? मी आमदार आहे आणि त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. जर कुणी अधिकारी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी नाटक करत असेल, तर आम्ही जानेवारीत परत सत्तेत येऊ. काँग्रेस लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधून बाहेर जाईल, असा दावाही त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, त्यामुळेच विजापूरमधील दोन मंत्री जे सत्ता आल्यानंतर हवेत उंच उड्डाणे घेतोय, असे वागत होते. त्यांचा आवाज आता काहीसा सौम्य झाला आहे. ३५ ते ४० आमदार पक्ष सोडण्यात तयार आहेत. हे त्यांना कळून चुकलंय. जर ३०-३५ जण तयर झाले तर हे सरकार पडेल.

बसवराज रायरेड्डी यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांकडून हल्लीच आमदारांच्या बैठकीमध्ये कर्नाटक हे भ्रष्ट राज्य बनल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी सांगितले की, त्यांचे स्वत:चे आमदार सांगत आहेत की, त्यांना पैसा हवाय, कारण त्यांनी निवडणुकीमध्ये खर्च केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्याBJPभाजपा