शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 21:14 IST

Karnataka: मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे.

मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे. आता भाजपाच्या एका बड्या नेत्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सिद्धारमैय्या सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे २५ आमदार पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असा दावा भाजपा नेते बसनगौडा पाटील यांनी केला आहे. 

विजापूर मतदारसंघातील आमदार असलेल्या बसनगौडा पाटील यांनी सांगितले की, राज्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येईल. काँग्रेस म्हणते की त्यांनी १३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र ते झोपू शकत नाही आहेत. जर ३० जणांनी पक्ष सोडला तर सरकार कोसळेल. २५ आमदार काँग्रेस सोडण्यास तयार आहेत. काही मंत्री त्यांच्याकडे सर्व शक्ती केंद्रित झाल्यासारखे वागत आहेत. तसेच ते अधिकाऱ्यांना हटवत आहेत किंवा त्यांच्या बदल्या करत आहेत.

विजापूरमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आल्याचा आरोप करत बसनगौडा पाटील म्हणाले की, तुम्ही मुस्लिमांना आणून काय करू शकता? मी आमदार आहे आणि त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. जर कुणी अधिकारी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी नाटक करत असेल, तर आम्ही जानेवारीत परत सत्तेत येऊ. काँग्रेस लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधून बाहेर जाईल, असा दावाही त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, त्यामुळेच विजापूरमधील दोन मंत्री जे सत्ता आल्यानंतर हवेत उंच उड्डाणे घेतोय, असे वागत होते. त्यांचा आवाज आता काहीसा सौम्य झाला आहे. ३५ ते ४० आमदार पक्ष सोडण्यात तयार आहेत. हे त्यांना कळून चुकलंय. जर ३०-३५ जण तयर झाले तर हे सरकार पडेल.

बसवराज रायरेड्डी यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांकडून हल्लीच आमदारांच्या बैठकीमध्ये कर्नाटक हे भ्रष्ट राज्य बनल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी सांगितले की, त्यांचे स्वत:चे आमदार सांगत आहेत की, त्यांना पैसा हवाय, कारण त्यांनी निवडणुकीमध्ये खर्च केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणsiddaramaiahसिद्धरामय्याBJPभाजपा