शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Pegasus : पेगॅसस प्रकरण संसदेत विरोधक लावून धरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:16 IST

Pegasus : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच शस्रास्रे खरेदीत पेगॅसस हेरगिरी प्रकरण लावून धरण्याची योजना विरोधी पक्षांनी बनवली आहे. 

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच शस्रास्रे खरेदीत पेगॅसस हेरगिरी प्रकरण लावून धरण्याची योजना विरोधी पक्षांनी बनवली आहे. काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधी तज्ज्ञांचा मोठा गट स्थापन केला जात आहे. हा गट सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून नव्या खुलाशावर सरकारकडे उत्तर मागेल. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समधील बातमीनंतर पेगॅससचा विषय सरकारला अडचणींचा ठरत चालला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात आधी दिलेल्या शपथपत्रात असे कोणतेही हेरगिरी उपकरण खरेदी केल्याचा इन्कार केलेला आहे. न्यायालयाची एक समिती सेवानिवृत्त न्यायाधीश रवीन्द्रन यांच्या देखरेखीत तपास करीत आहे. सरकारने न्यूयॉर्क टाइम्समधील बातमी निराधार असल्याचे म्हटले तरी विरोधी पक्ष त्याला सहमत नाहीत. काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने हेरगिरी करून देशद्रोह केला असून सर्वोच न्यायालयाला धोका दिला आणि संसदेची दिशाभूल केली आहे. 

न्यायमूर्ती रविंद्रन समितीने न्यूयॉर्क टाइम्सच्या पेगॅसस बातमीची दखल घ्यावी, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची पत्राद्वारे केली मागणीनवी दिल्ली : २०१७ साली झालेल्या संरक्षण कराराच्या वेळी भारताने इस्रायलकडून पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले होते, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला होता. त्या बातमीची पेगॅससप्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. आर. व्ही. रविंद्रन समितीने दखल घ्यावी, अशी मागणी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या समितीला एक पत्र पाठवून केली आहे. भारतात पेगॅससद्वारे राजकीय नेते, न्यायाधीश, पत्रकार, अन्य मान्यवर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते का, याची चौकशी ही समिती करत आहे. ए़डिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने व्ही. रविंद्रन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेगॅससबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दाव्यांपेक्षा वेगळा तपशिल मांडणारी बातमी न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केली आहे. त्या बातमीची दखल घेऊन चौकशी समितीने केंद्र सरकार, कॅग, वित्त, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती - तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांना पेगॅससबाबतचे त्यांचे मत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश द्यावेत.मोदी सरकारने देशद्रोह केला -राहुल गांधीपेगॅससप्रकरणी न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लष्करी कारणांसाठी असलेल्या पेेगॅसस स्पायवेअरचा राजकीय नेते व अन्य नागरिकांचे फोन टॅप करण्यासाठी वापर करून मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस